
फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज होय. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमधून आपल्याला प्रेरणा मिळते. तुकाराम महाराज यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. त्यांच्या अभंगाना व्यावहारिकतेची जोड होती. त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले. संत तुकाराम हे एक वारकरी, संत होते. संत तुकाराम यांचा जन्म देहू गावात झाला. संत तुकाराम यांना ‘जगद्गुरू’ म्हणून ओळखले जाते. वारकरी सांप्रदयासाठी त्यांनी केलेले काम उल्लेखणीय आहे. पण तुकाराम बीज म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात या संदर्भात थोडक्यात माहिती.
संत तुकाराम बीज सोहळा गुरुवार, 5 मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील देहू येथे साजरा केला जाणार आहे. हा सोहळा फाल्गुन वद्य द्वितीयेला साजरा केला जातो. हा सोहळा ३७८ वी पुण्यतिथी तिथी म्हणून हा सोहळा साजरा करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावर्षी हा सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत, देहूतील वैकुंठस्थान मंदिर आणि गाथा मंदिरात होणार आहे.
संत तुकारामांच्या जन्म वर्षाबाबत अनेक मतांतरे आहेत. संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते. म्हणजेच संत तुकाराम यांना देव सदेह वैकुंठी घेऊन गेल्याची श्रद्धा आहे. या दिवसालाच ‘तुकाराम बीज’ म्हणून संबोधले जाते.फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठ गमन केले. मात्र, संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले की नाही? याबाबत मतमतांतरे आहेत.
संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत, कवी होते. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून आणि कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले. संत तुकाराम बीजच्या दिवशी भाविक हे तुकाराम महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात, नमन तसेच अभिवादन करतात. यंदा 5 मार्च रोजी ‘तुकाराम बीज’ म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे.
संत तुकाराम यांचे देहू या आपल्या जन्म गावातच वैकुंठ गमन केले. त्या परिसरात एक मंदिर आहे. याच मंदिराच्या शेजारी एक नांदुरकी वृक्ष आहे. असे म्हटले जाते की, तुकाराम महाराज यांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण केले. हे नामस्मरण त्यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली केले. तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन हे ग्रामस्थांच्या समोर झाले आणि तेव्हापासून ग्रामस्थ या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात. इतकेच नाही तर तुकाराम बीजच्या दिवशी हा नांदुरकी वृक्ष हलतो अशी अनेकांची धारणा आहे. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने देहू येथे दर्शनासाठी येतात. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: संत तुकाराम महाराजांनी देहूत वैकुंठगमन केले, त्या दिवसाची स्मृती म्हणून साजरी केली जाणारी पुण्यतिथी म्हणजे संत तुकाराम बीज.
Ans: मुख्य सोहळा महाराष्ट्रातील देहू येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच राज्यातील विविध ठिकाणी वारकरी संप्रदायात हा दिवस विशेष मानला जातो.
Ans: पालखी सोहळा, अभंग गायकरी आणि कीर्तन भजन-कीर्तन कार्यक्रम, दिंडी मिरवणूक, विठ्ठल नामस्मरण