
फोटो सौजन्य- pinterest
ज्या सणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात, तो सण म्हणजे वटपौर्णिमा. हिंदू धर्मात तर हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात तसेच उपवास करतात. हा दिवस म्हणजे महिलांसाठी साज-श्रृंगार करण्याचा दिवस, या दिवशी अनेक महिला विविध रंगांच्या साड्या नेसतात. पण तुम्हाला माहितीय का? काही रंग असे असतात, जे धार्मिक श्रद्धेनुसार पूजेसाठी अजिबात योग्य मानले जात नाहीत. वटपौर्णिमा हा दिवस सौभाग्याचा असल्याने या दिवशी काही विशिष्ट रंग परिधान न करण्याची श्रद्धा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगांची साडी नेसू नये जाणून घ्या
पंचांगानुसार, वटपौर्णिमा महाराष्ट्रात सोमवार, 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी असल्याने विवाहित महिला वटसावित्री व्रत, वडाच्या झाडाची पूजा आणि उपवास करतात. पौर्णिमा ही स्वतःच अत्यंत शुभ आणि पुण्यदायी तिथी मानली जाते. धार्मिक कार्य, दानधर्म, जप-तप आणि पूजेसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. पंचागानुसार, वटपौर्णिमा यंदा सोमवारी येत असल्याने चंद्र आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो.
वटपौर्णिमेच्या दिवशी काळा, पूर्ण पांढरा रंग आणि गडद राखाडी रंगांची साडी नेसणे टाळावे. हिंदू धर्मामध्ये काळा रंग अनेक शुभ कार्यांमध्ये टाळला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंगांचा संबंध शनि ग्रहाशी संबंधित मानला जातो. वटपौर्णिमेसारख्या मंगल प्रसंगी काळी साडी नेसणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे अनेक महिला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळतात.
पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक असला तरी तो अनेक ठिकाणी वैराग्य आणि शोकाशीही जोडला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसण्याऐवजी रंगीत किंवा पारंपरिक साडीला प्राधान्य दिले जाते.
राखाडी किंवा फिकट उदास रंग काही परंपरांमध्ये उत्साह आणि मंगलतेच्या विरुद्ध मानले जातात. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तेजस्वी आणि सकारात्मकता दर्शवणारे रंग अधिक शुभ मानले जातात.
वटपौर्णिमेच्या दिवशी लाल, गुलाबी, हिरवा, पिवळा आणि केशरी रंग शुभ मानले जातात. हे रंग सौभाग्य, समृद्धी, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. विशेषतः हिरवी आणि लाल साडी परिधान करण्याची परंपरा अनेक भागांत आढळते.
वटपौर्णिमेचे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. सावित्रीचे धैर्य, निष्ठा आणि सौभाग्य यांचे प्रतीक म्हणून या दिवशी महिलांनी मंगलसूचक वस्त्रे आणि अलंकार धारण करावेत, अशी परंपरा आहे. म्हणूनच शुभ रंगांच्या साड्यांना विशेष महत्त्व दिले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: वटपौर्णिमेला लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी आणि केशरी रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते. हे रंग सौभाग्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत
Ans: हिरवा रंग सुखी वैवाहिक जीवन, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अनेक महिला या दिवशी हिरवी साडी नेसतात.
Ans: धार्मिक श्रद्धेनुसार शुभ रंग सकारात्मक ऊर्जा आणि मंगल वातावरण निर्माण करतात. मात्र व्रताचे खरे महत्त्व श्रद्धा, भक्ती आणि पूजाविधीत आहे.