Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात श्वास घेणे अवघड! ‘या’ जिल्ह्यांत प्रदूषणाचे संकट गंभीर; धूलिकणांची पातळी….

पुणे शहरात वार्षिक पातळी एनएएक्यूएसच्या थोडी खाली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनापेक्षा आठपट जास्त आहे. २०१९-२० च्या तुलनेत प्रदूषणात ११% वाढ झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 13, 2025 | 02:35 AM
महाराष्ट्रात श्वास घेणे अवघड! ‘या’ जिल्ह्यांत प्रदूषणाचे संकट गंभीर; धूलिकणांची पातळी….
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महाराष्ट्रात वायू प्रदूषणाचे संकट अधिक गंभीर बनले असून, राज्यातील निम्म्याहून अधिक शहरांनी ‘राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांपेक्षा’ (एनएएक्यूएस) जास्त प्रदूषणाची नोंद केली आहे. वातावरण फाउंडेशन आणि एन्व्हायरोकॅटलिस्ट यांनी संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध केलेल्या ‘महाराष्ट्रातील सर्वच शहरांमधील वातावरणीय वायूची गुणवत्ता स्थिती’ या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

हा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आठ वर्षांच्या आकडेवारीवर आधारित असून, ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळ्यातच तात्पुरता दिलासा मिळतो, मात्र त्यानंतर पुन्हा प्रदूषणाची पातळी वाढते, असे या अहवालात नमूद केले आहे.

अहवालानुसार, २०२४-२५ मध्ये सर्वेक्षण केलेल्या प्रत्येक शहराने पीएम १० साठी राष्ट्रीय मर्यादा ओलांडली आहे. पीएम २.५ च्या बाबतीत निम्म्याहून अधिक (१७) शहरांनी जास्त पातळी नोंदवली आहे, तर सर्वच शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे.

Air Pollution : दिल्लीतील प्रदूषणामुळे मोठं संकट; लहान मुलांसह गर्भवती महिला, ज्येष्ठांना धोका, केंद्राने जारी केल्या सूचना…

पीएम २.५ पातळीत मालेगाव हे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. जालना आणि जळगाव अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पीएम १० पातळीत जळगाव सर्वाधिक प्रदूषणग्रस्त शहर ठरले आहे. याउलट, सांगलीने सर्वात कमी पीएम २.५ आणि पीएम १० नोंदवले असून, हे एकमेव शहर आहे ज्याने राष्ट्रीय मानकांचे काही अंशी पालन केले.

अमरावती, कोल्हापूर, लातूर, मुंबई आणि विरार या शहरांनी २०१९-२० च्या तुलनेत पीएम १० पातळीत सुधारणा केली आहे. मात्र, जळगाव आणि नवी मुंबईत गेल्या पाच वर्षांत पीएम १० पातळी जवळपास दुप्पट झाली आहे. या अहवालात निधीविषयक तफावतही उघड झाली आहे. अमरावती आणि सोलापूर यांनी वाटप केलेल्या निधीपैकी ९५% पेक्षा जास्त वापर केला, तर मुंबईने ९३८.५९ कोटींपैकी फक्त ५७४.६४ कोटी रुपये आणि नागपूरने १४२ कोटींपैकी निम्म्याहून कमी रक्कम खर्च केली.

वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट म्हणाले की, ‘हवा प्रदूषणावरील धोरणे अस्तित्वात असली तरी अंमलबजावणीत विलंब आणि विसंगती गंभीर समस्या आहेत.’ तर एन्व्हायरो कॅटलिस्टचे संस्थापक सुनील दहिया यांनी सांगितले की, ‘राज्यातील बहुतांश शहरांतील धूलिकणांची पातळी राष्ट्रीय आणि जागतिक दोन्ही मानकांपेक्षा जास्त असून ती सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका ठरत आहे.’

प्रदूषणाने श्वास घ्यायलाही होतोय त्रास, धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

अहवालात हिवाळ्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी हंगामी कृती आराखडा अनिवार्य करणे, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात समाविष्ट नसलेल्या शहरांना समाविष्ट करणे, निरीक्षण केंद्रांचा विस्तार, आणि वाहतूक, बांधकाम, कचरा व ऊर्जा क्षेत्रांतील उत्सर्जनावर नियंत्रण या उपाययोजना तातडीने राबवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पुणे शहरात वार्षिक पातळी एनएएक्यूएसच्या थोडी खाली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनापेक्षा आठपट जास्त आहे. २०१९-२० च्या तुलनेत प्रदूषणात ११% वाढ झाली. शहरात हिवाळ्यात नियमितपणे धोकादायक हवा असते. नागरी प्रयत्न असूनही अंमलबजावणीतील त्रुटी कायम राहिल्याने ‘स्वच्छ प्रतिमे’खाली प्रदूषणाचे संकट झाकले गेले आहे.

Web Title: Air pollution crisis is becoming more serious in maharashtra naaqs malegaon pune jalgaon enviornment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Air Pollution
  • maharashtra news
  • pollution

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध
1

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना
2

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

Murbe Port Project Palghar : मुरबे बंदर प्रकल्पावर वाद : मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका, मंजुरीवर गंभीर प्रश्नचिन्ह
3

Murbe Port Project Palghar : मुरबे बंदर प्रकल्पावर वाद : मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका, मंजुरीवर गंभीर प्रश्नचिन्ह

दिल्ली नव्हे, देशातील ‘हे’ शहर ठरलं सर्वात प्रदूषित; श्वास घेणंही कठीण, रिपोर्टमध्ये खुलासा
4

दिल्ली नव्हे, देशातील ‘हे’ शहर ठरलं सर्वात प्रदूषित; श्वास घेणंही कठीण, रिपोर्टमध्ये खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.