Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीतील पराभवाचा ‘असर’ स्मृती विसरल्या अमेठीतील घर; स्मृतींच्या स्मृती जागविल्या पाहिजे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपमधील अनेक नेत्यांना फटका बसला. यामध्ये महिला नेत्यांमध्ये परखड भूमिका मांडणाऱ्या स्मृती ईराणी यांचा अमेठीमधून पराभव झाला. यामुळे त्यांनी अमेठीकडे पाठ फिरवली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 01, 2025 | 01:58 PM
BJP leader Smriti Irani never returned to Amethi after losing the 2024 Lok Sabha elections.

BJP leader Smriti Irani never returned to Amethi after losing the 2024 Lok Sabha elections.

Follow Us
Follow Us:

तानाजी म्हणाला, नेताजी आम्ही स्मृतींच्या स्मृती जागविल्या पाहिजेत. अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर स्मृती इराणी तिकडे औषधालाही दिसल्या नाहीत. त्यांचे अमेठीचे घर ओस पडले.  लोक ओसाड घराच्या पाटलीण कुठे आहेत, अशी विचारणा करीत आहेत. त्यांनी तर चांगलं घर बनविले आणि त्या मतदारही झाल्यात.

अमेठीत माशी शिंकली अन् स्मृती भुर्र उडाल्या न परतण्यासाठीच. ‘मै तुलसी तेरे आंगण की’ असे त्या अमेठीच्या मतदारांना म्हणत आधी निवडून आल्यात आता मात्र बेपत्ता झाल्यात. एकता कपूर यांनी ‘सास भी कभी बहू थी’ मालिकेत स्मृती इराणींना महत्त्वाची भूमिका छोट्या पडद्यावर सादर केली होती. स्मृतींनी आदर्श पात्र तुलसी बहूची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे साकारली. यातून त्या घराघरांत पोहोचल्या. अमेठीत भाजपाने त्यांना राहुल गांधींच्या विरोधात उभे करून निवडून आणले. त्यांना केंद्रीय मंत्री बनविले. नेताजी म्हणाले, तानाजी स्मृती इराणी माझ्या चांगल्यात लक्षात आहेत व राहतील. त्यांच्या शैक्षणिक योग्यतेवर काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यांना मानव संसाधन विकासमंत्री बनविले होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नामवंत शिक्षण संस्था त्यांच्या विभागाच्या अधिनस्थ होत्या. स्मृती ताम-झाम करीत स्वतःला उच्च विद्याविभूषित दर्शवित होत्या. त्यांनी अमेरिकेच्या वेल विद्यापीठातून एक आठवड्याचा सर्टिफिकेट ऑफ पार्टीसिपेशन कोर्स केला आणि त्यालाच त्यांनी डिग्री सांगितले. तानाजी म्हणाला, नेताजी हे बघा मंत्री होण्यासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. चौथी नापास राजकारणात पास होतो. मग मंत्री बनू शकतो. मुद्दा असा आहे की, स्मृती इराणी पराभूत झाल्यावर घरी परतल्या का नाहीत ?

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जेव्हा त्या प्रथम निवडून आल्यात तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, अमेठी माझे घर आहे. लोकांनी खासदार नाही तर दीदीला निवडले आहे. आता घरी एक झाडझूडवाला येतो अन् एक पंडित नवग्रह मंदिराची पूजा करून जातो. मला वाटते स्मृतींच्या स्मृतीतच हे घर नसावे. चार भिंती बांधल्या म्हणजे घर होत नाही. चार भिंतीआड संसार हवा, मग ते घर. नेताजी म्हणाले, अरे तान्या आता त्या मंत्री नाहीत अन खासदारही नाहीत. . त्या बेरोजगार आहेत. एक गीत आहे ‘दुखी मन मेरे, सून मेरा कहना. जहाँ नहीं चैना, वहाँ क्यू रहना.’ राहुल गांधींना पराभूत करणे भाजपाचे मिशन होते. ते पूर्ण झाल्यानंतर स्मृतींना कोण डोक्यावर घेणार? भाजपाच्या ठायी त्या नापास आहेत. अमेठीतील त्यांचे कार्यकर्ते गाण्यातून विचारतात ‘एक चतुर नार, कर के सिंगार, मेरे मन के द्वार घुसत जात, हम मरत जात.’

तानाजी म्हणाला, नेताजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार देणाऱ्या निर्मला सीतारामन यांना पुन्हा अर्थमंत्री बनविले आणि स्मृतीला ते विसरले. त्यांची उपयुक्तता आता संपली आहे. घर विकणे आहे अशी पाटी स्मृतींच्या घरावर लवकरच दिसेल अशी अमेठीत चर्चा आहे. बघू आता काय होते ते.

Web Title: Bjp leader smriti irani never returned to amethi after losing the 2024 lok sabha elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • BJP
  • MP Rahul Gandhi
  • Smriti Irani

संबंधित बातम्या

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!
1

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
2

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा
3

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
4

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.