Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dandi March Day: मिठाचा कायदा आणि त्यांची जिद्द; 12 मार्चला ‘त्या’ दिवसाने बदललं भारताचं नशीब, वाचा बापूंचा ‘तो’ धगधगता संघर्ष

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक दांडी मार्च (मीठ सत्याग्रह) च्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी १२ मार्च रोजी दांडी मार्च दिन साजरा केला जातो. १९३० मध्ये ब्रिटिश सरकारच्या मीठ कायद्याविरुद्ध हा मोर्चा काढण्यात आला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 12, 2026 | 06:30 AM
dandi march day 12 march mahatma gandhi salt satyagraha history marathi

dandi march day 12 march mahatma gandhi salt satyagraha history marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • ऐतिहासिक क्रांती
  • अहिंसेचे सामर्थ्य
  • जनतेचा सहभाग

Dandi March History Marathi : आज १२ मार्च! भारतीय इतिहासातील एक असा सुवर्ण दिवस, ज्या दिवशी एका हातात काठी आणि मनात अहिंसेचा विचार घेऊन ७८ अनुयायांसह एका दुबळ्या वाटणाऱ्या माणसाने साबरमती सोडली होती. उद्देश होता – ब्रिटिशांचा जुलमी ‘मीठ कायदा’ मोडीत काढणे. आज आपण ‘दांडी मार्च दिन’(Dandi March Day) साजरा करत असताना, हा केवळ एक ऐतिहासिक मोर्चा नव्हता, तर तो भारतीयांच्या आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्यासाठीच्या जिद्दीचा हुंकार होता.

मिठावर कर का? काय होता तो जुलमी कायदा?

त्याकाळी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मिठावर ब्रिटिशांनी मक्तेदारी गाजवली होती. भारतीयांना स्वतःचे मीठ तयार करण्यास किंवा विकण्यास मनाई होती. ब्रिटिशांकडून महागडे आणि अव्वाच्या सव्वा कर असलेले मीठ विकत घेणे सक्तीचे होते. गरिबांच्या ताटातील मिठावरही डल्ला मारणाऱ्या या कायद्याने महात्मा गांधींना अस्वस्थ केले. त्यांनी ठरवले की, जो निसर्ग सर्वांना विनामूल्य मीठ देतो, त्यावर कर लावणारा कायदा हा अन्यायकारक आहे आणि तो मोडलाच पाहिजे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ड्रॅगनच्या दारात भारताचे ‘यमदूत’! BrahMos आणि Akashच्या जोडीने फिलीपिन्स अभेद्य; चीनच्या नौदलाला पळता भुई थोडी

३८४ किलोमीटरचा प्रवास आणि २४ दिवसांचा संघर्ष

महात्मा गांधींनी १२ मार्च १९३० रोजी सकाळी ६:३० वाजता साबरमती आश्रमातून कूच केले. एकूण ३८४ किलोमीटर (२४१ मैल) अंतर कापून त्यांना दांडी या गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचायचे होते. बापूंची चालण्याची गती आणि जिद्द पाहून ब्रिटिशांनाही धडकी भरली होती. वाटेत प्रत्येक गावात बापूंचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात व्हायचे. लोक त्यांच्या प्रवाहात सामील होत गेले आणि ७८ जणांची ही छोटी तुकडी दांडीला पोहोचेपर्यंत दोन मैल लांब जनसागरात बदलली होती.

‘मैने नमक का कानून तोडा है’  ६ एप्रिलचा तो ऐतिहासिक क्षण

५ एप्रिलला गांधीजी दांडीला पोहोचले आणि ६ एप्रिल १९३० रोजी सकाळी ६ वाजता त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक मीठ हातात उचलले. मिठाचा तो एक खडा उचलताच गांधीजी म्हणाले, “मी आज ब्रिटिश साम्राज्याच्या पायाला धक्का दिला आहे.” हे केवळ मीठ उचलणे नव्हते, तर ते सविनय कायदेभंग चळवळीचे अधिकृत बिगुल होते. त्यानंतर देशभर मिठाचे कायदे मोडले गेले, जंगल सत्याग्रह झाले आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला गेला.

महिला आणि जागतिक माध्यमांचे लक्ष

दांडी मार्चने पहिल्यांदाच भारतीय महिलांना घराबाहेर पडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेण्यास प्रवृत्त केले. सरोजिनी नायडूंसारख्या नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. तसेच, अमेरिकी पत्रकार वेब मिलर यांनी ब्रिटिशांनी सत्याग्रहींवर केलेल्या लाठीमाराचे चित्रण जगासमोर मांडले, ज्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dubai International Airport वर इराणी ड्रोनचा धुमाकूळ; एका भारतीयासह 4 जण रक्ताच्या थारोळ्यात, या गोंधळाचा VIDEO VIRAL

निष्कर्ष: दांडी मार्चची आजची प्रासंगिकता

आज ९६ वर्षांनंतरही दांडी मार्चचे महत्त्व कमी झालेले नाही. ही यात्रा आपल्याला शिकवते की, सत्यासाठी दिलेला लढा कितीही छोटा वाटला तरी, जर तो अहिंसक आणि प्रामाणिक असेल, तर तो जगातील सर्वात मोठ्या सत्तेलाही नमवू शकतो. दांडी मार्च ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून ती लोकशाही आणि मानवी हक्कांच्या संघर्षाची चिरंतन प्रेरणा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दांडी मार्च केव्हा सुरू झाला आणि कधी संपला?

    Ans: दांडी मार्च १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून सुरू झाला आणि ६ एप्रिल १९३० रोजी दांडी येथे संपला.

  • Que: गांधीजींसोबत सुरुवातीला किती अनुयायी होते?

    Ans: सुरुवातीला गांधीजींसोबत त्यांच्या आश्रमातील ७८ निवडक अनुयायी होते.

  • Que: दांडी यात्रेचे एकूण अंतर किती होते?

    Ans: ही पदयात्रा साधारण २४ दिवस चालली आणि तिने ३८४ किलोमीटर (२४१ मैल) अंतर पार केले.

Web Title: Dandi march day 12 march mahatma gandhi salt satyagraha history marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 06:30 AM

Topics:  

  • day history
  • Mahatma Gandhi
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

Working Moms Day: मल्टिटास्किंगची राणी! घरासोबतच ऑफिस सावरणारी ‘सुपरमॉम’; आज आहे तिचा ‘हा’ खास दिवस
1

Working Moms Day: मल्टिटास्किंगची राणी! घरासोबतच ऑफिस सावरणारी ‘सुपरमॉम’; आज आहे तिचा ‘हा’ खास दिवस

National Dream Day: स्वप्नांना द्या सत्याचे पंख! जाणून घ्या ‘हा’ खास दिवस तुम्हाला कसा देतोय आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा?
2

National Dream Day: स्वप्नांना द्या सत्याचे पंख! जाणून घ्या ‘हा’ खास दिवस तुम्हाला कसा देतोय आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा?

मुलींना लावून शिक्षणाची ओढ…! सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाचा प्रेरणादायी मराठमोळे विचार
3

मुलींना लावून शिक्षणाची ओढ…! सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाचा प्रेरणादायी मराठमोळे विचार

CISF Raising Day: सुरक्षेचा कणा! ‘या’ 3000 जवानांपासून सुरू झालेलं दल आज जगातील सर्वात मोठं औद्योगिक रक्षक कसं बनलं
4

CISF Raising Day: सुरक्षेचा कणा! ‘या’ 3000 जवानांपासून सुरू झालेलं दल आज जगातील सर्वात मोठं औद्योगिक रक्षक कसं बनलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.