Rajiv Gandhi was assassinated by a suicide bomber on 21 May History
भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. 21 मे 1991 रोजी त्यांची आत्मघाती बॉम्बस्फॉट करुन त्यांची हत्या करण्यात आली. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये मारेकऱ्यांसह तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि 14 जणांचा मृत्यू झाला. राजीव गांधी प्रचार सभेत भाषण देण्यासाठी असलेल्या व्यासपीठाकडे चालायला सुरुवात केली. वाटेत त्यांना अनेक शुभचिंतक, काँग्रेस कार्यकर्ते आणि शाळकरी मुलांनी हार घातली. मारेकरी कलैवनी राजरत्नम ही त्यांच्या जवळ आली आणि स्वागत केले. त्यानंतर तिने त्यांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकली आणि रात्री ठीक 10.10 वाजता तिच्या कपड्यांखाली असलेल्या आरडीएक्स स्फोटकांनी भरलेल्या बेल्टचा स्फोट केला. अशा प्रकारे राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा