
Subedar Tanaji Malusare attained martyrdom in Sinhagad Battle February 4th History
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या अग्निकुंडात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यापैकी एक म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे. स्वतःच्या घरचे लग्नकार्य बाजूला सारुन स्वराज्याच्या रक्षणासाठी तानाजी मालुसरे कोंढाणा किल्लाच्या मोहिमेवर गेले. आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे असे विडा उचलून तानाजी मालुसरे यांनी विजयाचा पण केला. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला आणि जीवाची बाजी लावून लढत दिली. तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना वीरगती आली. आजच्या दिवशी सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यांच्या जाण्याने स्वराज्याचे मोठे नुकसान झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) म्हणाले की, गड आला पण सिंह गेला…! (Dinvishesh)
04 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
04 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
04 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष