
Din Vishesh
दरवर्षी जगभरात २२ मार्च रोजी जागतिक पाणी दिवस साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमांतर्गत १९९३ साली हा दिवस सुरु करण्यात आला होता. याचे उद्दिष्ट लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे, त्याचे संरक्षण आणि शाश्वत वापरावर जनजागृती करण्याचा आहे. आजही जगभरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई ही गंभीर समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या, औद्यागिकीकरण, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे स्वच्छ पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी लोकांना पिण्यासाठीही शुद्ध पाणी उपलब्ध नाही. यामुळे पाणी वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
22 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1739 : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
1933 : डखाऊ छळछावणीची सुरुवात झाली, डखाउची छळछावणी म्युनिकच्या डखाऊ उपनगरात नाझी राजवटीच्या काळातील छळछावणी होती.
1945 : अरब लीगची स्थापना झाली.
1970 : हमीद दलवाई यांनी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
1980 : पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (PETA) प्राणी हक्क संस्थाची स्थापना
1996 : नासाचे स्पेस शटल अटलांटिस त्याच्या 16व्या मोहिमेवर प्रक्षेपित झाले
1999 : लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर.
2020 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 च्या प्रसाराशी लढा देण्यासाठी देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कर्फ्यूची घोषणा केली.
22 मार्च रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1797 : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1888)
1924 : अल नेउहार्थ ( Allen Harold “Al” Neuharth) – यूए.एस.ए. टुडे चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2013)
1924 : ‘मधुसूदन कालेलकर’ – नाटककार आणि पटकथाकार यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1985)
1930 : ‘पॅट रॉबर्टसन’ – ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक यांचा जन्म.
1933 : ‘अबोलहसन बनीसद्र’ – इराण चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
22 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष
1832 : ‘योहान वूल्फगाँग गटें’ – जर्मन महाकवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1749)
1984 : ‘प्रभाकर पाध्ये’ – लेखक आणि पत्रकार यांचे निधन.
2004 : ‘व्ही. एम. तारकुंडे’ – कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर यांचे निधन. (जन्म: 3 जुलै 1909)