Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहलगाम हल्ल्यानंतरही सामना का? ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचा पंतप्रधान मोदी आणि BCCIला थेट सवाल

पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात संताप असताना, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. त्यांनी बीसीसीआयवर देशाच्या सन्मानापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देत

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 14, 2025 | 07:10 PM
पहलगाम हल्ल्यानंतरही सामना का? ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचा पंतप्रधान मोदी आणि BCCIला थेट सवाल
Follow Us
Close
Follow Us:
  • पहलगाम हल्ल्यानंतरही सामना का?
  • ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचा पंतप्रधान मोदी आणि BCCIला थेट सवाल
  • बीसीसीआयसाठी पैसा देशाच्या सन्मानापेक्षा मोठा

आशिया कप 2025 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. एका बाजूला क्रिकेट चाहते या सामन्यासाठी प्रचंड उत्साहित आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक या सामन्याला विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) ने पंतप्रधान मोदी यांना एक सविस्तर पत्र लिहून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

मैच शहीदांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान

एआयसीडब्ल्यूएने आपल्या पत्रात म्हटले आहे की, “140 कोटी भारतीयांसह, अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) आज, 14 सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करते आणि त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करते.”

या संघटनेने पुढे म्हटले की, “अशा वेळी जेव्हा आपला देश जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे दु:खात आहे, जिथे 26 निष्पाप भारतीयांना त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांचा धर्म विचारून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निर्घृणपणे मारले, अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना आयोजित करणे हे आपल्या शहीदांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे.”

Virat आणि Rohit नाही, तरी ‘हे’ 2 खेळाडू पाकिस्तानवर पडणार भारी; Team India च्या विजयाची तयारी पूर्ण

बीसीसीआयसाठी पैसा देशाच्या सन्मानापेक्षा मोठा

एआयसीडब्ल्यूएने बीसीसीआयवर गंभीर आरोप केला. त्यांनी पत्रात लिहिले, “भारत सरकारने आधीच पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक पाऊले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर, एआयसीडब्ल्यूएने यापूर्वीच पाकिस्तानी कलाकारांवर आणि ‘सरदार जी 3’ सारख्या चित्रपटांवर भारतात बंदी घातली होती. मात्र, बीसीसीआय देशाच्या सन्मानापेक्षा पैशाला अधिक महत्त्व देत असल्यासारखे दिसते आहे. खेळाच्या नावाखाली ते एका दहशतवादी देशासोबत संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.” त्यांनी पुढे म्हटले, “बीसीसीआयसाठी जरी क्रिकेट सर्वोच्च असला, तरी भारताच्या लोकांसाठी आमचे राष्ट्र प्रथम येते.”

नागरिकांच्या बलिदानासोबत विश्वासघात

एआयसीडब्ल्यूएने पंतप्रधान मोदींकडे या सामन्याला तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले, “भारत-पाक यांच्यातील सामना आयोजित करणे हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे आपले प्राण गमावलेल्या सैनिकांच्या आणि नागरिकांच्या बलिदानासोबत विश्वासघात आहे.” या संघटनेने देशातील सर्व नागरिक, सेलिब्रिटी आणि चित्रपट निर्मात्यांना या सामन्यावर बहिष्कार टाकून विरोध करण्याचे आवाहनही केले आहे.

Web Title: All indian cine workers association direct question to prime minister modi and bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 07:10 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : IND vs PAK सामना की राजकीय रणधुमाळी? इंडियन आर्मीचाही ‘अशी’ प्रतिक्रिया आली समोर
1

Asia Cup 2025 : IND vs PAK सामना की राजकीय रणधुमाळी? इंडियन आर्मीचाही ‘अशी’ प्रतिक्रिया आली समोर

IND W vs AUS W: प्रतिका रावलची धुवांधार फलंदाजी; पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियासमोर भारताने ठेवले 282 धावांचे लक्ष्य
2

IND W vs AUS W: प्रतिका रावलची धुवांधार फलंदाजी; पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियासमोर भारताने ठेवले 282 धावांचे लक्ष्य

INDvsPAK Live : पाकिस्तानचे मॅचनंतरचे चित्र भारतात मॅचपूर्वीच; देशात रस्त्यावर फुटले TV
3

INDvsPAK Live : पाकिस्तानचे मॅचनंतरचे चित्र भारतात मॅचपूर्वीच; देशात रस्त्यावर फुटले TV

Virat आणि Rohit नाही, तरी ‘हे’ 2 खेळाडू पाकिस्तानवर पडणार भारी; Team India च्या विजयाची तयारी पूर्ण
4

Virat आणि Rohit नाही, तरी ‘हे’ 2 खेळाडू पाकिस्तानवर पडणार भारी; Team India च्या विजयाची तयारी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.