Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो दोन्ही बाजूने बोलतो.., तो ढोंगी आहे’ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर माजी क्रिकेटपटूची ‘त्या’ निर्णयानंतर जहरी टीका 

आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. यावरुन माजी खेळाडू मनोज तिवारीने भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 26, 2025 | 05:08 PM
'He talks both ways.., he's a hypocrite' Former cricketer's venomous criticism of head coach Gautam Gambhir after 'that' decision

'He talks both ways.., he's a hypocrite' Former cricketer's venomous criticism of head coach Gautam Gambhir after 'that' decision

Follow Us
Follow Us:

 Asia cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. ही स्पर्धा यावेळी टी 20 स्वरूपात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला अवघे दिवस बाकी आहेत. भारत 10 सप्टेंबरला युएइविरुद्ध पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. त्यानंतर 14 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मोठी लढत बघायला मिळणार आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याने हा सामना होणार असल्याचे समजते. याबाबत आता माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.

तिवारीने म्हटले आहे की, गौतम गंभीर जेव्हा भारतीय संघाचा प्रशिक्षक नव्हता तेव्हा त्याचे भारत-पाकिस्तान यांच्या सामन्याबाबत फार वेगळी मतं असायची. मात्र आता मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीर मूग गिळून गप्प बसला आहे, असं माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी गंभीरवर निशाणा साधत म्हटले आहे.  भारत पाकिस्तान यांच्यात सामना होणार असल्याने मनोज तिवारीकडून  संताप व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा

नेमकं काय म्हणाला मनोज तिवारी?

मनोज तिवारीने भारत पाकिस्तान सामन्याबाबत आपला संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, “पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानकडून निर्दोष भारतीयांची हत्या करण्यात आली. आता आम्हाला शत्रू राष्ट्रासोबत क्रिकेट खेळाव लागणार आहे. हे चुकीचं आहे.”

मनोज तिवारीने क्रिकट्रॅकरशी बोलताना म्हटले की, “मला कायम असं वाटत आल आहे की,  तो दोन्ही बाजूने बोलत असतो. तो ढोंगी आहे. कारण ही तीच व्यक्ती आहेत जी कोच नसताना म्हणत असे की, भारत-पाकिस्तान सामना व्हायला नको. आता तो काय करणार आहे? आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. भारतीय संघ आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. आता तो राजीनामा का देत नाही?भारतीय संघासोबत असणार नाही. असे का सांगत नाही?” असे मत तिवारीने व्यक्त केले आहे.

गौतम गंभीरने काय मत मांडले होते?

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी गौतम गंभीर एका कार्यक्रमात म्हटला होता की, “भारताने पाकिस्तानविरुद्ध आयसीसी स्पर्धेत देखील खेळू नये. पाकिस्तान  जोपर्यंत त्याच्या दहशतवादी कारवाया बंद करत नाही तोपर्यंत असेच करायला हवे.”  यानंतर देखील भारत पाकिस्तान सामना पार पडला होता.

हेही वाचा : टॉप टेन टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..! आकडेवारीने स्पष्ट केले ‘हे’ कारण

Web Title: Asia cup 2025 former cricketer manoj tiwari criticizes head coach gautam gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Gautam Gambhir
  • manoj tiwari
  • PAK vs IND
  • Team India

संबंधित बातम्या

IND A vs SL A: भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले; ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले
1

IND A vs SL A: भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले; ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले

‘गंभीरला हटवा अन् धोनीला…’; भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद? ‘या’ खेळाडूने केली मोठी मागणी
2

‘गंभीरला हटवा अन् धोनीला…’; भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद? ‘या’ खेळाडूने केली मोठी मागणी

Team India: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! एकाच दिवशी टीम इंडियाचे तब्बल ३ मोठे सामने; वेळापत्रक लगेच नोट करून ठेवा
3

Team India: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! एकाच दिवशी टीम इंडियाचे तब्बल ३ मोठे सामने; वेळापत्रक लगेच नोट करून ठेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.