
आजचा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, रिचा घोष, श्री चरणी, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर यांच्यावर भारतीय संघाची मदार असणार आहे. भारताने आतापर्यंत 3 पैकी सामने 2 सामने जिंकले आहेत. साऊथ आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारताचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा प्रवास खडतर झाला आहे.
काय सांगतो हेड टू हेड रेकॉर्ड?
भारत आणि बांग्लादेशचा संघ आतापर्यंत 23 सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारताचा संघ वरचढ ठरला आहे. भारताने बांग्लादेशविरुद्ध 23 पैकी तब्बल 20 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे मजबूत दिसून येत आहे. टी 20 वर्डकपमध्ये भारत आणि बांग्लादेशमध्ये 3 वेळेस आमनेसामने आले आहेत. तीनही सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसून येत आहे.
IND W Vs BAN W: उद्या करो या मरो! सेमीफायनलसाठी भारताला बांग्लादेशविरुद्ध विजय आवश्यक
मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा पराभव केला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे उद्याचा सामना भारतीय संघाला उद्याचा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्याचा सामना अत्यंत रोमांचक होण्याचा अंदाज आहे. सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू आहे. भारतीय महिला संघ ग्रुप 2 मधून खेळत आहे. तीन पैकी दोन सामन्यात भारताने विजय प्राप्त केला आहे. तर कालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र या तीनही सामन्यांमध्ये श्री चरणी या स्पिनरने अचूक अन् भेदक गोलंदाजी करत आपल्या नावावर नवा रेकॉर्ड केला आहे.
Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड
भारत: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीकीपर), यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा.
बांग्लादेशचा संघ: जुआयरिया फिरदौस, दिलारा अख्तर, शर्मिन अख्तर, निगार सुलताना,शोभना मोस्तारी, शॉर्ना अख्तर, रितू मोनी, राबेया खातून, नाहिदा अख्तर, मारुफा अख्तर, संजिदा अख्तर मेगला