BCCI Secretary Jay Shahs big gift
BCCI Secretary Jay Shah’s Big Gift to Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी टी-20 विश्वचषकात भारताच्या (Team India) ऐतिहासिक विजेतेपदाचे कौतुक करताना रविवारी संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून भारताने दुसरे टी-२० विश्वविजेतेपद पटकावले.
BCCI सचीव जय शहांकडून संघाला मोठी भेट
I am pleased to announce prize money of INR 125 Crores for Team India for winning the ICC Men’s T20 World Cup 2024. The team has showcased exceptional talent, determination, and sportsmanship throughout the tournament. Congratulations to all the players, coaches, and support… pic.twitter.com/KINRLSexsD
— Jay Shah (@JayShah) June 30, 2024
125 कोटींचे बक्षीस जाहीर
यानंतर जय शाहने सोशल मीडियाच्या माध्यमातून संघासाठी 125 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. शाह यांनी X वर लिहिले की, “आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक 2024 जिंकण्यासाठी टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. या संघाने आपल्या समर्पण, कठोर परिश्रम आणि अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर फायनल जिंकली आणि याचा सर्व देशवासीयांना अभिमान वाटला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि इतर खेळाडूंच्या मदतीने त्यांनी १.४ अब्ज भारतीयांची स्वप्ने आणि अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.
‘संघाने टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या’
जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘रोहित शर्माच्या असाधारण नेतृत्वाखाली, या संघाने उत्कृष्ट दृढनिश्चय आणि कामगिरी दाखवली आहे, आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एकही सामना न गमावता स्पर्धा जिंकणारा पहिला संघ बनला आहे. संघाने आपल्या विलक्षण कामगिरीने आपल्या टीकाकारांनाही गप्प केले.
‘आपल्या चमकदार कामगिरीने टीकाकारांची तोंडे केली बंद’
भारताची जेतेपदाची मोहीम प्रेरणादायी असल्याचे सांगून शाह म्हणाले, ‘खेळाडूंनी क्रिकेट समीक्षकांचा सामना केला, टीकाकारांचा सामना केला आणि चमकदार कामगिरी करून त्यांना शांत केले. खेळाडूंचा प्रवास प्रेरणादायी असून आज ते महान खेळाडूंच्या पंक्तीत सामील झाले आहेत. भारतीय खेळाडूंनी या हंगामात एकही सामना न हारता हा विश्वचषक आपल्या नावावर केल्याने त्यांचे कौतुक आहे.