
आनंद महिंद्रा यांची विराट कोहलीसाठी खास पोस्ट
विराट कोहलीची फायनलमध्ये 75 रन्सची शानदार खेळी
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी
Anand Mahindra On Virat Kohli: काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना पार पडला. अंतिम सामन्यात आरसीबीने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान विराट कोहलीने कालच्या सामन्यात 75 रन्सची शानदार खेळी केली. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी विराटसाठी खास पोस्ट शेयर केली आहे.
विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 2025 आणि 2026 मध्ये कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. कालच्या अंतिम सामन्यात त्याने 75 रन्सची शानदार खेळी केली. त्यावर आता आनंद महिंद्रा यांनी विराटचे खास कौतुक केले आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी विराटचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले आनंद महिंद्रा?
‘हा एक सांघिक खेळ आहे. कालच विजय हा पूर्ण संघाचा विजय आहे. प्रत्येक जेतेपदाची एक अशी कथा असते, जी त्याला विशेष बनवते. ही कथा बऱ्याच अंशी या माणसाची म्हणजेच विराट कोहलीची आहे. त्याची मेहनत, कष्ट आणि विश्वास यामुळे हे शक्य झाले आहे. अनेक वर्ष पराभव स्वीकारून देखील तो आपल्या संघासोबत उभा आहे.
Yes, it’s a team sport. And this is a team victory. But every championship has a story that comes to define it. This one belongs, in no small measure, to this man. Because of his Loyalty, Commitment, Belief. He stayed the course through years of near misses and… https://t.co/KsaSIue9aV pic.twitter.com/ExwuyTWNyv — anand mahindra (@anandmahindra) May 31, 2026
अखेर त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. हा विजय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून, कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठी प्रेरणा आहे.’ विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबीसोबत खेळत आहे.