
2027 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी भारताने तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान माजी क्रिकेटपटू अभिनव मुकुंदने आगामी वर्ल्डकपसाठी आपला 15 जणांचा आवडता संघ जाहीर केला आहे. इंग्लंडविरुद्ध भारताने मालिका गमावली. या सर्व घडामोडीनंतर मुकुंदने निवडलेल्या संघामुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे.
अभिनव मुकुंदने आयसीसी वर्ल्डकप 2027 साठी संघाची निवड करताना प्रामुख्याने खेळाडूंचा अनुभव आणि संघाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनव मुकुंदने शुभमन गिलला कर्णधार म्हणून पसंती दिली आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला संघात कायम ठेवले आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये अनुभव देखील महत्वाचा असतो असे, त्याने स्पष्ट केले.
भारतीय संघाची मिडल ऑर्डरसाठी मुकुंदने श्रेयस अय्यरवर विश्वास दर्शवला आहे. तसेच विकेटकिपर म्हणून केएल राहुल आणि इशान किशन यांची निवड करण्यात आली आहे. ऑल राऊंडर म्हणून हार्दिक पंड्याला त्याने स्थान दिले आहे. तसेच फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल आणि सुंदरला स्थान दिले आहे.
2027 चा वर्ल्डकप साऊथ आफ्रिका आणि नाबीनियामध्ये होणार आहे. तेथील पीच हे वेगवान गोंदाजांना मंडतशीर ठरते. त्यामुळे अभिनव मुकुंदने भारतीय संघात भारताचा हुकूम एक्का जसप्रीत बूमराहला स्थान दिले आहे. मोहम्मद सिरिज, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि गूरनूर ब्रारला स्थान दिले आहे. तसेच मुकुंदने स्पिनर्समध्ये कुलदीप यादवची निवड केली आहे.
जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…
आयसीसी वर्ल्डकप 2027 मध्ये होणार आहे. त्यासाठी 8 संघांनी आपला प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. मात्र दोन वेळेस वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला 2027 च्या वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेस्ट इंडिज संघाला प्रवेश मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील वर्षी होणार आयसीसी 2027 चा वर्ल्डकप साऊथ आफ्रिका, नाबीनिया आणि झिम्बाब्वेमध्ये होणार आहे. यजमान देशांचे म्हणजेच झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिकेचे स्थान आधीच निश्चित झालेले आहे. ना