Davis cup : टेनिसमध्ये भारताच्या हाती पुन्हा निराशा; कोरियाने रचला नवा इतिसाह सौजन्य : आयएएनएस
टेनिसमधील डेव्हिस चषका (Davis cup) च्या नव्या फॉर्मेटमध्ये इतिहास रचण्याची भारताची संधी थोडक्यात हुकली. अंतिम-८ मध्ये जागा मिळवणारा पहिला आशियाई देश बनण्याचे भारताचे स्वप्न कोरियन संघाने पूर्ण होऊ दिले नाही. शनिवारी सियोलमध्ये खेळवल्या गेलेल्या क्वालिफायर राउंड-२ च्या सामन्यात कोरियाने भारताचा ३-१ असा पराभव केला.
या वर्षाच्या सुरुवातीला नेदरलंडला पराभूत केल्यानंतर भारताकडे इतिहास रचण्याची संधी होती, पण सुरुवातीच्या दोन्ही एकेरी सामन्यात पराभव मिळाल्याने कठिण परिस्थिती निर्माण झाली होती. दुहेरी सामन्यात शानदार कामगिरी करत भारताने काही काळ सामन्यात पुनरागमन केले होते, पण कोरियाने चौथ्या सामन्यात विजय प्राप्त करत सामना आपल्या नावे केला.
दक्षिणेश्वर सुरेश आणि एन. श्रीराम बालाजी या जोडीने कोरियन जोडीचा ६-३, ३-६, ६-३ असा पराभव करत भारताच्या विजयाच्या आशा कायम राखल्या होत्या. दुसरा सेट गमावल्यानंतर भारतीय जोडीने दमदार पुनरागमन केले. त्यांनी अतितटीच्या निर्णायक सेटमध्ये संयम राखला व महत्त्वपूर्ण ब्रेक प्राप्त केले, ज्यामुळे ते सामन्यात सर्व्हिस करण्याच्या स्थितीत आले. त्यानंतर भारताला सामना जिंकण्यासाठी इतर दोन एकेरी सामन्यात विजय मिळवायचा होता. त्यामुळे सुमित नागल काही काळ दबावात आल्याचे दिसले.
या काळात कोरियाच्या सुनवू क्वोनने एकेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात शानदार कामगिरी करत सुमित नागलला गेममध्ये चांगली कामगिरी करण्याची कोणतीच संधी दिली नाही. क्वोनने सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम राखला व पहिला सेट ६-१ असा आपल्या नावे केला. नागलने दुसरा सेट आपल्या नावे करण्याचा प्रयत्न केला, पण कोरियाच्या टेनिसपटूने त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. अखेरीस त्याने हा सेट ६-२ असा जिंकत कोरियाला डेव्हिस चषकाच्या नॉकआउट फेरीत पोहचवण्याचा मान मिळवला.
या पराभवासह भारताच्या डेव्हिस चषकातील शानदार मोहिमेचा शेवट झाला. भारत नव्या फॉर्मेटमध्ये अंतिम-८ मध्ये पहिल्यांदा जागा मिळवणारा आशियाई देश बनला असता. कोरियाने या विजयासह आशियाई टेनिसमध्ये इतिहास रचला आहे. कोरिया आता स्पर्धेच्या नॉकआउट फेरीत जागा मिळवणारा पहिला आशियाई देश ठरला आहे.
आता भारत २०२७ साली क्वालिफायर राउंड-१ मध्ये खेळेल. सियोलमध्ये झालेल्या या सामन्यासह रोहित राजपाल यांच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळाचा शेवट होऊ शकतो, कारण त्यांचा सध्याचा कॉन्ट्रॅक्ट हा डिसेंबर २०२६ पर्यंतचा असून अद्याप तो वाढवण्यात आल्याची घोषणा करण्यात आलेली नाही.
पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…






