Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! IND VS PAK सामन्यावर बहिष्कार? माजी क्रिकेटपटूने थोपटले दंड; म्हणाला, ‘सामना पाहणार नाही..

आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना होणार आहे, या सामन्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने बहिष्कार टाकला असून तो हा सामना पाहणार नाही. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 11, 2025 | 05:40 PM
Big news! Boycott of IND VS PAK match? Former cricketer slapped a fine; said, 'I will not watch the match..'

Big news! Boycott of IND VS PAK match? Former cricketer slapped a fine; said, 'I will not watch the match..'

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात 
  • १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना 
  • माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचा भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार 

Manoj Tiwari boycotts IND VS PAK match : आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात  झाली असून आतपर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. या वेळी आशिया कपमधील सामने यूएईमदये खेळवण्यात येत आहेत. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवला आहे तर दुसऱ्या सामन्यात भारताने यूएईचा दणदणीत पराभव केला आहे. आता भारताचा दूसरा सामना १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वीच भारतातून विरोधी सुर उमटायला लागले आहेत. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांच्याकडून भारत-पाकिस्तान सामना पाहणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी सामना होणार आहे.  या सामन्याबाबत माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी म्हटले आहे की, या सामन्यावर बहिष्कार टाकणार आहे आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण ते  पाहणार नाही.  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे.  यानंतर आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्यावर लागून असणार आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : शुभमन गिलचा षटकार पाहताच वसीम अक्रम चक्रावला! रिएक्शन झाली व्हायरल; पहा व्हिडिओ

माजी क्रिकेटपटू आणि बंगाल सरकारमधील मंत्री मनोज तिवारी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे खूपच अन्याय्य आहे, कारण ही गोष्ट आपल्या लोकांच्या बलिदानाचा अपमान देखील आहे. बीसीसीआयच्या करारामुळे खेळाडू बोलत नाहीत, परंतु केंद्र सरकार आणि बीसीसीआयकडून या सामन्याला परवानगी देण्यात येऊ नये.

हावडा येथे माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज तिवारी म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना कअ खेळवण्यात येत आहे?  हा सामना खेळवण्यात येऊ नये, दहशतवादी पाकिस्तानातून येतात आणि आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतात आणि निघून जातात. म्हणूनच, पाकिस्तान क्रिकेट संघासोबत सामना खेळण्याचा कोणताच प्रश्नच निर्माण होत नाही.”

तिवारी पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तानला देखील या गोष्टीची माहिती आहे की, त्यांच्या देशातील  दहशतवादी हे भारतात दहशत पसरवत असतात, ते त्यांना संपवू शकत नाहीत का? आमचे केंद्र सरकार आता काय करत आहे, ते झालेल्या पहलगाम दहशतवादी घटनेला इतक्या लवकर विसरले आहेत का? आमचे निष्पाप लोक मारले गेले आहेत. अशा वेळी, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करणार नाही , तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत सामना खेळू शकत नाही.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘याआधी टी-२० मध्ये असे कधीच…’, भारताच्या ‘या’ सलामीवीराच्या वादळावर वसीम अक्रमची प्रतिक्रिया; पहा व्हिडीओ

माजी क्रिकेटपटू तिवारी यांनी म्हटले आहे की, “मी १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना पाहणार नाही. मी या सामन्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकत  आहे. आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना वगळता सर्व सामने हे वेळापत्रकानुसारच झाले पाहिजे. पण, भारत-पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्यात यावी.”

Web Title: Former cricketer manoj tiwari boycotts ind vs pak match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • manoj tiwari
  • Salman Ali Agha
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘याआधी टी-२० मध्ये असे कधीच…’, भारताच्या ‘या’ सलामीवीराच्या वादळावर वसीम अक्रमची प्रतिक्रिया; पहा व्हिडीओ
1

Asia cup 2025 : ‘याआधी टी-२० मध्ये असे कधीच…’, भारताच्या ‘या’ सलामीवीराच्या वादळावर वसीम अक्रमची प्रतिक्रिया; पहा व्हिडीओ

Asia cup 2025 : शुभमन गिलचा षटकार पाहताच वसीम अक्रम चक्रावला! रिएक्शन झाली व्हायरल; पहा व्हिडिओ 
2

Asia cup 2025 : शुभमन गिलचा षटकार पाहताच वसीम अक्रम चक्रावला! रिएक्शन झाली व्हायरल; पहा व्हिडिओ 

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात
3

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात

Photo : फक्त 27 चेंडूत भारताने रचला इतिहास! नोंदवला T20I मधील सर्वात मोठा विजय
4

Photo : फक्त 27 चेंडूत भारताने रचला इतिहास! नोंदवला T20I मधील सर्वात मोठा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.