
T20 World Cup 2026: Doubts raised over Pakistan's boycott! Coach Gautam Gambhir's reaction creates a stir; what exactly happened?
Gautam Gambhir’s reaction to the India vs Pakistan match : भारत आणि श्रीलंका संयुक्त आयोजित करत असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेला ७ फेब्रुवारी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ सज्ज झाले आहे. अलीकडेच पाकिस्तान संघाने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.याबाबत बरेच वाद निर्माण होताना दिसून येत आहेत. दरम्यान, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारताविरुद्धच्या हाय-व्होल्टेज T20 विश्वचषक सामन्यातून माघार घेण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर बोलण्यास नकार दिला.
मुंबईला जाण्यापूर्वी, विमानतळावरील पत्रकारांनी गौतम गंभीरला टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रश्नांकडे पूर्णपणे केल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांच्या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार देखील मानले आणि काहीही न बोलता पुढे निघून गेले.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गट अ मध्ये आहेत. या गटात अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया यांचा देखील समावेश आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पाकिस्तान त्याच दिवशी कोलंबोमध्ये नेदरलँड्सविरुद्ध आपला पहिला सामना खेळून मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर भारतनंतर अमेरिकेशी दोन हात करणार आहे.
विश्वचषकापूर्वी भारतीय संघ चांगल्याच फॉर्ममध्ये दिसून येत आहे. भारताने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-१ अशी बाजी मारली. तसेच पाकिस्तान संघाने आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केले आणि या स्पर्धेत प्रवेश केला आहे. तथापि, आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानचा रेकॉर्ड खूपच खराब असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही संघ आतापर्यंत आठ वेळा एकमेकांसमोर येऊन उभे ठाकले. ज्यामध्ये भारताने सात सामने आपल्या खिशात टाकले आहेत. तर पाकिस्तान संघाला फक्त एकच विजय मिळवण्यात यश आले.
मागील वर्षीच्या आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर चांगलाच दबदबा राखला. अंतिम सामन्यासह संपूर्ण मालिकेत भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यांमध्ये भारताचे युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी आपली छाप पडली होती. विशेषतः, तिलक वर्माने १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अंतिम सामन्यात नाबाद ६९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
पाकिस्तान संघ: सलमान अली आघा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.