
फोटो सौजन्य - Star sports सोशल मिडिया
Hardik Pandya Celebration : काल भारत विरूद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये सुपर 8 चा महत्वाता सामना चेपाॅकच्या मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. टीम इंडियाने शानदार कामगिरी करत झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकला आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऐतिहासिक खेळी केली आणि टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या रचली. संघाने २० षटकांत २५६ धावा केल्या. कालच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते.
यावेळी त्याने मैदानावर दुसऱ्याच चेंडूपासून कहर करायला सुरूवात केली होती. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने या सामन्यात पुन्हा एकदा आपली स्फोटक फलंदाजी दाखवली. त्याने फक्त २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. यानंतर, त्याने एका खास शैलीत सेलिब्रेशन देखील केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मागील काही दिवसांपासून हार्दिक आणि महिका या दोघांचे सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
हार्दिक पंड्याने झिम्बाब्वेविरुद्ध डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. स्पर्धेतील हे त्याचे दुसरे अर्धशतक होते. यापूर्वी त्याने नामिबियाविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर हार्दिकने एका खास पद्धतीने आनंद साजरा केला. त्याने स्टेडियममध्ये बसलेल्या त्याच्या मैत्रिणीकडे बॅट दाखवली आणि तिला अनेक फ्लाइंग किस दिली. पंड्याची स्फोटक फलंदाजी पाहून माहिका देखील आनंदी दिसली. तिने तिच्या जागेवरून उभी राहून त्याचे सतत कौतुक केले. पंड्याच्या रोमँटिक सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.
𝐂𝐨𝐦𝐞𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐦𝐨𝐦𝐞𝐧𝐭, 𝐜𝐨𝐦𝐞𝐭𝐡 𝐇𝐚𝐫𝐝𝐢𝐤 𝐏𝐚𝐧𝐝𝐲𝐚. 🤌 A breathtaking burst at the death by him, powered #TeamIndia past 250 with authority! 🙌 ICC Men’s #T20WorldCup 👉 SUPER 8, #INDvZIM | LIVE NOW ➡️ https://t.co/vIdZg7mGmy pic.twitter.com/LazrvENuz8 — Star Sports (@StarSportsIndia) February 26, 2026
टीम इंडियाने हा सामना ७२ धावांनी जिंकला. हार्दिक पंड्याने केवळ बॅटनेच नव्हे तर बॉलनेही शानदार कामगिरी केली. त्याने ३ षटके टाकली आणि फक्त २१ धावा दिल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पंड्याव्यतिरिक्त, अभिषेक शर्मानेही या सामन्यात आपला फॉर्म परत दाखवला. त्याने ३० चेंडूत ५५ धावांची जबरदस्त खेळी खेळली. या स्पर्धेत पंड्या टीम इंडियाचा सर्वात मौल्यवान खेळाडू राहिला आहे.