
दुखापतीमुळे हर्षितला २०२६ च्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर त्याने बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये दीर्घकाळ चाललेल्या पुनर्वसन प्रक्रियेत (रिहॅबिलिटेशन प्रोग्राम) सहभाग घेतला आणि फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवले. मात्र, तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर गोलंदाजी करताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याला मैदान सोडावे लागले. सुरुवातीला जुनी दुखापत पुन्हा उद्भवली असावी असे वाटले होते, परंतु आता समोर आलेल्या वृत्तांनी संपूर्ण परिस्थितीच बदलून टाकली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोलंदाजी करताना हर्षितला वारंवार क्रॅम्प्स येत होते. याचे कारण त्याचे अतिरिक्त वजन असल्याचे मानले जाते. त्याचे वजन सुमारे ९७ किलो होते, तर फिटनेसच्या निर्धारित निकषांनुसार ते ९६ किलोपेक्षा कमी असणे आवश्यक होते. असे असूनही, त्याला ‘फिट’ घोषित करून संघासोबत पाठवण्यात आले. आता या निर्णयामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
अहवालात असेही नमूद केले आहे की, संघ व्यवस्थापनाला हर्षित राणाचा संघात समावेश करायचा होता आणि म्हणूनच त्याला तंदुरुस्तीबाबतची मंजुरी (फिटनेस क्लिअरन्स) देण्यात आली होती. मात्र, या दाव्याबाबत बीसीसीआय किंवा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. तरीही, मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाबाबत बोर्ड नाराज असून ते तंदुरुस्ती तपासणी प्रक्रियेचा आढावा घेण्याच्या तयारीत आहे.
बीसीसीआय या संपूर्ण प्रकरणामुळे अत्यंत निराश आणि संतप्त आहे. त्यांनी वैद्यकीय आणि फिजिओथेरपी कर्मचाऱ्यांना फिजिओला कोणाच्याही मताचा विचार न करता प्रत्येक खेळाडूसाठी समान फिटनेस मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात कोणत्याही खेळाडूसाठी वेगळे निकष लावले जाणार नाहीत आणि सर्वांसाठी एकसमान ‘फिटनेस धोरण’ लागू असेल. अशी सूचना देण्यात आली आहे. हर्षित राणाचे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे जेव्हा भारतीय संघ आधीच खेळाडूंच्या दुखापतग्रस्त आहेत. जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्या यांसारखे खेळाडूही अलीकडच्या काळात फिटनेसच्या समस्यांमुळे संघाबाहेर आहेत. वारंवार होणाऱ्या दुखापतींचा परिणाम संघाच्या रचनेवरही होत आहे.