
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतीय संघ आज विश्वचषकाचा दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने यूएसएला पराभूत करुन विजयी सुरूवात केली आहे. भारताच्या संघासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे पण त्याआधी भारतीय संघामधील दुखापतीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून भारतीय संघाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. नामिबियाविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यापूर्वी, काही भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीबद्दल चिंता कायम आहे.
आता यामध्ये इशान किशनची सराव सत्रादरम्यान झालेली दुखापत यांचा समावेश आहे. जसप्रीत बुमराहच्या वेगवान यॉर्करने नेटमध्ये पायाच्या बोटाला मारल्यानंतर इशान किशनला खूप वेदना होत होत्या. यामुळे आजच्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यात इशान किशन खेळणार की नाही असा प्रश्न निर्माण होतो.
खरं तर, इशान किशनच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दैनिक जागरणचे क्रीडा संपादक अभिषेक त्रिपाठी यांनी वृत्त दिले आहे की, इशान किशन आज नामिबियाविरुद्धच्या सामन्यात (India vs Namibia T20 World Cup 2026) खेळेल. याचा अर्थ असा की इशान किशनची दुखापत बरी झाली आहे आणि तो पुन्हा मैदानावर कहर करण्यास सज्ज आहे.
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला पोटाशी संबंधित आजारामुळे अलीकडेच दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तथापि, त्याच्या सामन्याच्या तंदुरुस्तीबाबत अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की त्याची उपलब्धता सामन्यापूर्वी त्याला कसे वाटते यावर अवलंबून असेल. अभिषेक आजारी असूनही अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळला, पण दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला आणि सामन्यादरम्यान तो मैदानात उतरला नाही. त्यानंतर तो सराव सत्राला मुकला. त्यामुळे, जर तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर त्याचा संघ संयोजनावर परिणाम होऊ शकतो.
Ishan Kishan was hit (left toe) in the nets by Bumrah, but he got medical attention, got up, batted a little more and left. He even had a brief chat with a DDCA official before heading back to the dressing room.#INDvsNAM #T20WorldCup2026 pic.twitter.com/d9pKsyCZcL — Aakash Biswas (@aami_aakash) February 11, 2026
टीम इंडियाने २०२६ च्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने केली. टीम इंडियाने तो सामना जिंकला, पण सूर्याशिवाय इतर कोणताही फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी नामिबियाविरुद्धचा आजचा सामना महत्त्वाचा मानला जात आहे.