
ind vs sl
सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉईंट्स टेबल पाहिल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड तर चौथ्या स्थानी बांग्लादेशचा संघ आहे. पाचव्या स्थानी भारतीय संघ विराजमान आहे. भारताने जेव्हा या सिरिजमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना जिंकला तेव्हा त्यांची पीसीटीमध्ये वाढ झाली होती. रॅंकिंगमध्ये फायदा झाला नव्हता.
मात्र दुसरा सामना देखील भारत जिंकण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील फायदा होणार आहे. तसेच त्यांचा पीसीटी देखील वाढणार आहे. म्हणजे भारतीय संघ पाचव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर पोहोचणार आहे. तर श्रीलंकेचा संघाची घसरण होण्याची शक्यता आहे.
IND Vs SL: क्रिकेटमध्ये अक्षरक्ष: खळबळ! Team India जिंकल्यास WTC पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ
भारत अन् श्रीलंका यांच्यात सध्या टेस्ट सिरिज सुरू आहे. त्यातील पहिला सामना गॉल येथे झाला. हा सामना भारतीय संघाने 165 रन्सने जिंकला होता. त्यानंतर कोलंबो येथील कसोटीत देखील भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्ध पकड मजबूत असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीलंकेने आपल्या 7 विकेट्स गमावल्या आहेत. जर फॉलोऑन हवा असेल तर श्रीलंकेला किमान 304 रन्सपर्यन्त पोहोचणे आवश्यक असणार आहे. जे सध्या थोडेसे अवघड असल्याचे दिसून येत आहे.
दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल होणार आहेत. भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकल्यास भारताला फायदा होणार आहे. भारतीय संघ पॉईंट्स टेबलमध्ये थेट चौथ्या स्थानावर पोहोचणार आहे. आगामी काळात भारतीय संघाला अनेक आवाहनात्मक सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून आत्मविश्वास आणि पॉईंट्स वाढवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करताना दिसून येत आहे.