
photo- social media
ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह
भारताने पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला ७ विकेट्सने पराभूत केले. तर, दुसऱ्या सामन्यात ९० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. शनिवारी खेळलेल्या सामन्यात फलंदाज ईशान किशनने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या ४४ चेंडूंमध्ये ८१ धावा केल्या. यामध्ये ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यासह उपकर्णधार, तिलक वर्माने देखील ,शानदार फलंदाजी करत ६० धावा ठोकल्या. सलग २ टी- २० सामन्यात विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाने पुन्हा एकदा आयसीसी टी- २० रँकिंगम मधील अव्वल स्थान पटकावले आहे. आजचा हा सामना जिंकल्यास संघाला आयसीसी क्रमवारीत आणखी फायदा होऊ शकतो.
भारत : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव.
झिम्बाब्वे : ब्रायन बेनेट, बेन कुरन, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली मधवेरे (विकेटकीपर), तडवनाशे मारुमणी, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.