
भारत जपानविरुद्ध सामना खेळणार
भारतीय संघ आशियाई खेळांच्या मैदानात उतरण्यापूर्वी स्वतःची तयारी पडताळून पाहण्यासाठी आणि आशियाई वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी या सराव सामन्याचा पूर्ण फायदा घेईल. क्रिकेट रसिकांसाठी देखील एका नवख्या संघाविरुद्ध भारताचा सामना पाहण्याची ही एक उत्सुकतेची पर्वणी ठरणार आहे.
पुरुष क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात भारत आणि जपान हे दोन देश समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानमधील क्रिकेटच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक सामन्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. भारत आणि जपान या दोन देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या विशेष टी२० सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तारीख: मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ९:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)
ठिकाण – जपान
IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी