Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War : ‘हे शेजाऱ्यांचे काम..’ Shahid Afridi काही सुधरेना! युद्धबंदीला मानून बसला ‘विजय’, भारतावर पुन्हा ओकली गरळ.. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच वाढत गेला आहे. आता दोन्ही देशात युद्धबंदी लागू केलीय आहे. आशावेळी मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी भारताविरुद्ध सतत आग ओकत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 15, 2025 | 09:38 AM
India Pakistan War: 'This is the work of the neighbors..' Shahid Afridi Nothing has improved! 'Vijay' accepted the ceasefire, India again attacked..

India Pakistan War: 'This is the work of the neighbors..' Shahid Afridi Nothing has improved! 'Vijay' accepted the ceasefire, India again attacked..

Follow Us
Close
Follow Us:

India Pakistan War : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच वाढत गेला असताना  युद्धबंदी करारानंतर दोन्ही देशांमधील हल्ले थांबवण्यात आले आहेत. परंतु, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी मात्र थांबण्याची काही एक चिन्हे दिसत नाही आहेत. त्याने पुन्हा एकदा भारताबद्दल आक्षेपार्ह विधानं केली आहेत.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आता पूर्वीपेक्षाही जास्त खराब झाले आहेत. या काळात शाहिद आफ्रिदी त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत  चर्चेत येत आहे. युद्धबंदीनंतर विजय यात्रा काढून त्याने स्वतःची चेष्टा देखील करून घेतली. पण यावेळी त्याने भारतावर पाकिस्तानची प्रगती रोखण्याचे गंभीर आरोप देखील केले आहेत.

हेही वाचा : ‘Cheteshwar Pujaraला संघातून वगळल्यावर रडू कोसळले..’, पूजा पुजाराचा ‘The Diary of a Cricketer’s Wife’ पुस्तकात मोठा खुलासा

आम्हाला थांबवले जात आहे..

पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना शाहिद आफ्रिदीने  पुन्हा एकदा भारताविरुद्ध मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे भारत हा पाकिस्तानची प्रगती थांबवत असल्याचा आरोप त्याच्याकडून करण्यात आला आहे. तो म्हणाला की, “भारत पुढे जात आहे, आम्हाला त्यांच्या प्रगतीबद्दल  आनंद आहे. त्यांचे क्रिकेटही पुढे जात आहे, जी एक चांगली गोष्ट आहे. आम्ही पुढे जात आहोत, मात्र आम्हाला थांबवले जात आहे, अन्यथा आम्ही वेगाने पुढे गेलो असतो. हे शेजाऱ्यांचे काम आहे का?”

आफ्रिदी हे विसरून गेला की, पाकिस्तान क्रिकेटचे सर्वात मोठे शत्रू त्यांचे स्वतःचेच लोक आहेत, किंवा त्याला ते माहित असेलही पण ते त्याला  स्वीकारायचे नाही. गेल्या काही वर्षांत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अनेक अध्यक्षांनी अचानक आपल्या पदांचा राजीनामा दिल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच प्रशिक्षक आणि कर्णधार देखील सतत बदलले आहेत.

एक विशेष की, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचे मोठे नुकसान केले आहे, त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भ्याड कृत्य करत भारतातील सामान्य नागरिकांवर ड्रोनने हल्ले केले. परंतु भारतीय सैन्याने ते हल्ले हाणून पाडले आहेत. जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली तेव्हा शाहिद आफ्रिदीने तो आपल्या देशाचा विजय असल्याचे मानले आणि त्याने विजय यात्रा देखील काढली होती.

हेही वाचा : IPL 2025 : बीसीसीआयला मोठा झटका! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची IPL मधून माघार? WTC खेळण्यासाठी मायदेशी परतण्याचे आदेश..

शाहिद आफ्रिदीचा भाऊ २००३ मध्ये अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत मारला गेला होता. तसेच भाऊ शाकिब हा हरकत-उल-अन्सार बटालियन कमांडर असल्याचे बोलेल जात होते. बीएसएफकडून सांगण्यात आले होते की, शाकिबचे शाहिद आफ्रिदीशी संबंध होते, जे त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहेत, परंतु आफ्रिदीकडून हे सर्व नाकारण्यात आले होते.

Web Title: India pakistan war shahid afridi nothing has improved vijay accepts ceasefire criticizes india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • Shahid Afridi

संबंधित बातम्या

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान
1

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.