
रोहित अन् विराट संघातून बाहेर पडणार? 'गेल्या दशकापासून ते...' Shubhman Gill चे मोठे विधान
भारत आणि इंग्लंडमध्ये 14 जुलै म्हणजे उद्यापासून एकदिवसीय सिरिज सुरू होणार आहे. त्याआधी कर्णधार शुभमन गिलने मीडियाशी संवाद साधला. यामध्ये शुभमन गिलने अनेक प्रश्नावर उत्तर दिल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने 2027 मधील वर्ल्डकपच्या तयारीबाबत देखील भाष्य केले आहे.
शुभमन गिलने संघ निवड आणि संघातील खेळाडूंची खेळण्याची जागा यावर भाष्य केले. साऊथ आफ्रिका येथे कोणते मिश्रण चांगले राहील अशी चर्चा नेटसमध्ये विराट कोहलीशी सुरू असल्याचे शुभमन गिलने सांगितले. सध्या संघात नसणारे पण भविष्यात कोणते खेळाडू आहेत जे संघात योग्य ठरू शकतील यावर चर्चा झाल्याचे त्याने सांगितले. आमच्यात याबद्दल चर्चा झाली.
कर्णधार शुभमन गिलने अनेक दिवसांपासून रोहित-विराटच्या वनडे क्रिकेटच्या भविष्याबाबत देखील भाष्य केले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्या दशकापासून भारतीय क्रिकेटच्या फलंदाजीचा मुख्य कणा राहिला आहे. आजही ते संघाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन आमच्यासारख्या युवा खेळाडूंसाठी आणि संपूर्ण संघासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
कर्णधार शुभमन गिलले जसप्रीत बूमराहचे एकदिवसीय संघात झालेले पुनरागमन यावर भाषा केले आहे. बूमराहच्या कमबॅकवर त्याने आनंद व्यक्त केला आहे. तीन वर्षांनी बूमराह एकदिवसीय फॉर्मटमध्ये परतला आहे. त्याचे प्रदर्शन चांगले असेल याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही ही सिरिज सकारात्मकपणे पूर्ण करू, असे कर्णधार शुभमन गिल म्हणाला आहे.
‘किंग’ Kohli राडा घालणार! वेगवान 15 हजार रन्स अन्…; Sachin Tendulkar च्या ‘त्या’ रेकॉर्डचा गेम ओव्हर
भारत अन् इंग्लंडमध्ये उद्यापासून एकदिवसीय मालिकेचा थरार सुरू होणार आहे. या आगामी सामन्यात विराट केवळ मैदानावर उतरणार नाही, तर दोन अत्यंत ऐतिहासिक महा-विक्रमांना गवसणी घालण्याच्या उंबरठ्यावर असणार आहे. त्यामध्ये क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड मोडण्याची संधी त्याच्याकडे असेल. सर्वात प्रथम विराट कोहली उद्या आपला 300 वा वनडे सामने खेळणार आहे. त्याने आतापर्यंत 311 सामने खेळले असून 299 डावात फलंदाजी केली आहे. उद्याच्या सामन्यात खेळायला येताच ही त्याची ३०० वी वनडे इनिंग ठरणार आहे.