
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली उद्या पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. तो इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. तर श्रेयस अय्यर उपकर्णधार असणार आहे. उद्याच्या सामना खेळल्यास विराट कोहली सौरव गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबर करताना दिसणार आहे.
विराट कोहली आतापर्यंत भारतीय संघासाठी 311 वनडे सामने खेळला आहे. त्यामध्ये 299 सामन्यांमध्ये तो फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. उद्याचा सामना त्याचा 300 वा सामना फलंदाज म्हणून असणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये काहीच खेळाडू 300 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. सौरव गांगुलीने 300 वनडे खेळून झाल्यावर निवृत्ती घेतली होती. आता उद्याच्या सामन्यात विराट कोहली गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी करणार आहे. सौरव गांगुलीने 311 वनडे खेळून 300 सामन्यांमध्ये फलंदाजी केली आहे.
नुकतीच इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज पार पडली. या सिरिजमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत करत मालिका जिंकली आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला आहे. 5 पैकी 4 सामने भारताने गमावले. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याचे दिसून आले.
वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, संजू सॅमसन या मालिकेत अपयशी ठरल्याचे दिसून आले. एखादा सामना वगळता त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजी देखील एवढी चांगली खेळ करू शकली नाही. त्यामुळे सलग दुसरी मालिका भारताने गमावली. आता उद्यापसून वनडे सिरिज सुरू होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बूमराह आणि कर्णधार शुभमन गिल यामध्ये खेळताना दिसणार आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात आतापर्यंत ११० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघाने ६१ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. दोन सामने ड्रॉ राहिले तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. हेड टू हेडची आकडेवारी पाहता भारतीय संघाचा दबदबा स्पष्ट दिसत आहे.