
टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला जिंकावे लागणार सर्व सामने
सराव सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
14 जूनला भारत पाकिस्तान आमने सामने
Women’s Team India: आयपीएलचा थरार संपला आहे. आता लवकरच आयसीसी महिला वर्ल्ड कप 2026 सुरू होणार आहे. 12 जूनपासून वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. भारताचा संघ आज वेस्ट इंडिजविरुद्ध सराव सामना खेळला. या सामन्यात भारताने 26 रन्सने विजय मिळवला आहे. मात्र वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे.
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा संघ ए ग्रुपमध्ये असणार आहे. या ग्रुपमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ असणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड चांगला असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रुप स्टेजपासूनच भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
भारत ग्रुप स्टेजमध्ये नेदरलँड, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्याविरुद्ध खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा इतर संघांना पराभूत करणे भारताला सहज शक्य होऊ शकते. मात्र क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे भारताला प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा दारुण पराभव
12 जूनपासून आयसीसी महिला विश्वचषक 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. 14 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. त्यापूर्वी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघाचा सराव सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिज संघाचा 26 रन्सने पराभव झाला आहे. दरम्यान आजच्या सामन्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
IND V SL: श्रीलंकेची धुलाई करण्यासाठी Vaibhav Sooryavanshi सज्ज; कधी सुरू होणार सामना?
भारताची फलंदाजी
वेस्ट इंडिजच्या महिला संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी प्रथम मैदानात उतरला. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने भारताची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र स्मृती मंधाना 39 रन्स करून आउट झाली. तर शेफाली वर्मा 29 रन्स करून आउट झाली. त्या पाठोपाठ जेमिमाह रॉड्रिग्जने केवळ 7 रन्स केल्या. यास्तिका भाटियाने देखील 26 बॉलमध्ये 36 रन्सची कहली केली. भारतीय महिला संघाकडून भारती फूलमाळीने अर्धशतकी खेळी केली. भारती 56 रन्सची शानदार खेळी केली. ऋचा घोष शून्यावर आउट झाली. राधा यादव, श्रेयांका पाटील आणि क्रांति गौड व श्री चरणीला फलंदाजीमध्ये चांगली खेळी करता आली नाही.