
फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad
आयपीएल २०२६: आयपीएल 2026 चा पहिला सामना पार पडला या सामन्यामध्ये आरसीबीच्या संघाने बाजी मारली. पहिल्या सामन्यामध्ये विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांची शानदार कामगिरी पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा कर्णधार इशान किशनने याने अर्धशतक ठोकले पण तो संघाला विजयापर्यत नेण्यात अपयशी ठरला. इशान किशनच्या नेतृत्वाखालील आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाला सामोरे जावे लागले. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना संघाने २०२ धावा केल्या, परंतु गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही.
आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत केवळ १५.४ षटकांतच लक्ष्य गाठून इतिहास रचला. या सामन्यात इशान किशन पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत होता. पराभवानंतर बोलताना, संघाच्या कोणत्या चुकांमुळे असा दारुण पराभव झाला हे त्याने स्पष्ट केले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला आपल्या कमकुवत गोलंदाजीचे परिणाम भोगावे लागले. संघाची गोलंदाजी २०२ धावांचे लक्ष्य वाचवू शकली नाही.
सामन्यानंतर कर्णधार इशान किशन म्हणाला, “मला वाटते की पहिल्या तीन ते चार षटकांमध्ये खेळपट्टी खूप चांगली खेळली. आम्ही काही झटपट विकेट्स गमावल्या, ज्यावर आम्हाला पुढच्या वेळी लक्ष द्यावे लागेल, कारण दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप सोपी झाली होती. पुढच्या वेळी आम्हाला आमच्या फटक्यांच्या निवडीमध्ये थोडे अधिक हुशारीने वागावे लागेल. चेंडू बॅटवर चांगला येत होता. पण हो, आम्ही काही गोष्टी चांगल्या केल्या, ज्यामुळे आम्हाला नक्कीच आत्मविश्वास मिळेल.”
🚨 ISHAN KISHAN REFLECTS ON THE LOSS AGAINST RCB 🚨 Ishan 🗣️ – “The wicket played well after the first few overs. We lost early wickets and we have to be careful about it. The wicket got better in the second innings and we have to be a little smarter with the shot selection.… pic.twitter.com/S8ht3f5igd — Pratyush Halder (@pratyush_no7) March 28, 2026
या सामन्यात इशान किशनने शानदार फलंदाजी करत आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स संघ पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी इशान किशन २१० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता. त्याने ३८ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ५ षटकारांसह ८० धावा केल्या. त्याच्या प्रभावी खेळीमुळे सनरायझर्सला २० षटकांत २०१ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. मात्र, आगामी सामन्यांमध्ये विजय मिळवायचा असेल, तर संघाला आपल्या गोलंदाजीवर काम करावे लागेल.