
मुंबईने केकेआरवर 6 विकेट्सने मिळवला विजय
रोहित शर्माचे वानखेडेवर वादळी अर्धशतक
आंद्रे रसेल नसल्याने केकेआरच्या पराभवाची चर्चा
Tata IPL MI vs KKR: काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात सामना पार पडला. आयपीएलच्या या सामन्यात अक्षरश: धावांची खैरात पाहायला मिळाली. केकेआरने दिलेले 221 धावांचे लक्ष्य मुंबईच्या संघाने सहज पूर्ण केले. रोहित शर्मा, रिकल्टनने केलेल्या अर्धशतकी खेळीने मुंबईचा विजय झाला. मात्र केकेआरचा विजय आंद्रे रसेल नसल्यामुळे झाला अशी चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे.
कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 220 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 221 धावांची गरज होती. मात्र कोलकाताच्या संघाने सुरुवातीला जो वेग पकडला होता तो डेथ ओव्हर्समध्ये पाहायला मिळला नाही. शेवटच्या 21 चेंडूत एकही षटकार केकेआरचे फलंदाज मारू शकले नाहीत, त्यामुळे त्यांची अपेक्षित धावसंख्या 240 ते 250 ऐवजी 220 वर थांबली.
शेवटच्या 21 चेंडूत अतिरिक्त धावा न झाल्यानेच मुंबईचा विजय झाला असे म्हटले जात आहे. त्यामुळे केकेआरला नक्कीच आंद्रे रसेलची आठवण आली असणारच. शेवटच्या टप्प्यात संघाला चांगली धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी फिनिशर्सकडे असते. मात्र रिंकू सिंग आणि रमनदीप सिंह यांनी आक्रमक खेळी न केल्याने केकेआरला मोठी धावसंख्या करता आली नाही. रनरेट कमी पडल्याने धावसंख्या 220 धावांवर अडकली.
विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी
आंद्रे रसेलने केकेआर संघातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे यंदा तो संघात खेळण्यासाठी उपलब्ध नाहीये. तो संघाचा कोच म्हणून कार्यरत आहे. दरम्यान केकेआरच्या संघात आंद्रे रसेल असतं तर काल संघाला मोठी धावसंख्या शेवटच्या टप्प्यात करता आली असती आणि विजय देखील मिळवता आला असता अशी चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’
अखेर तब्बल 14 वर्षांची आपली परंपरा मुंबई इंडियन्सने मोडीत काढली आहे. 14 वर्षांनी मुंबई इंडियन्सने आपला लीग मधला पहिला सामना जिंकला आहे. हिटमॅन रोहित शर्माने 78 धावांची तडाखेबंद खेळी केली. मुंबई इंडियन्सने केकेआरवर विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच पहिला सामना जिंकत 14 वर्षांची परंपरा देखील मोडीत काढली आहे.
बदाम हलव्यासारखं ठोकलं! अवघ्या 22 चेंडूत Rohit Sharma चा वानखेडेवर धुमाकूळ, KKR ला धुतले
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 78 धावांची तडाखेबंद खेळी केली. तर रिकल्टनने 80 धावांची महत्वाची खेळी केली. सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपला इरादे स्पष्ट केले. 8 चेंडूत 16 धावा करून सूर्यकुमार यादव बाद झाला. तिलक वर्माने देखील संघाच्या विजयासाठी महत्वचे योगदान दिले. हार्दिक पंड्याने शेवटपर्यंत मैदानात राहून संघाला विजयापर्यंत पोहोचवले.