
कृणाल पांड्या सहा वर्षांनंतर टीम इंडियात परतणार? विश्वचषकापूर्वी निवड समितीची डोकेदुखी वाढली
३५ वर्षीय कृणाल पांड्याच्या दबावाखाली कामगिरी करण्याच्या क्षमतेने गेल्या दोन हंगामात आरसीबीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या हंगामात कृणालने आपल्या शानदार फलंदाजीची झलक दाखवली आहे. त्याने सहा डावांमध्ये ३५.२५ च्या सरासरीने आणि १५०.०० च्या स्ट्राइक रेटने १४१ धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा आणि ७३ धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे. त्याने २९ पेक्षा जास्त सरासरीने आणि ८.७० च्या इकॉनॉमी रेटने १० बळीही घेतले आहेत. ज्यात २/३० ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
कृणाल पांड्याने भारतासाठी पाच एकदिवसीय सामने खेळले असून, चार डावांमध्ये ६५.०० च्या सरासरीने आणि १०१.५६ च्या स्ट्राइक रेटने १३० धावा केल्या आहेत. यामध्ये पदार्पणात केलेल्या ५८* धावांच्या खेळीचा समावेश आहे, जे एकदिवसीय पदार्पणात भारतीय खेळाडूने केलेले सर्वात जलद अर्धशतक आहे. त्याने पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन बळीही घेतले आहेत. १९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १० डावांमध्ये, त्याने २४.८० च्या सरासरीने आणि १३० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने १२४ धावा केल्या आहेत, ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या २६ नाबाद आहे. त्याने ३६ पेक्षा जास्त सरासरीने १५ बळीही घेतले आहेत, ज्यात एका चार बळींच्या कामगिरीचा समावेश आहे.
मला तीव्र पेटके येत होते. याची सुरुवात माझ्या पोटरीतून झाली, ते नितंबांपर्यंत आणि नंतर पाठीपर्यंत पसरले. मला तीव्र पेटके येत होते. मी सहसा इतका वेळ फलंदाजी करत नाही. मला कठीण परिस्थिती आवडते आणि मी नेहमी त्यासाठी तयारी करतो व त्याची वाट पाहतो. साहजिकच, मला सामना पूर्ण करायचा होता, पण मी ते करू शकलो नाही. पण भुवीने खेळलेला फटका हा सामन्यातील सर्वोत्तम फटका होता. ती अशी खेळपट्टी होती जिथे तुम्हाला क्रिकेटनुसारच फटके खेळावे लागतात. ती अशी खेळपट्टी नव्हती जिथे तुम्ही गोलंदाजांना लक्ष्य करू शकाल. तुम्हाला मेहनत करावी लागली, मन लावून खेळावे लागले आणि डाव खेळावा लागला.