
MS Dhoni किंवा Rohit Sharma नाही, तर ‘या’ कर्णधाराचा आयपीएलमध्ये सर्वोत्तम रेकॉर्ड! (photo Credit- X)
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सला प्रत्येकी 5 वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या धोनी आणि रोहितचा दबदबा सर्वश्रुत आहे. मात्र, आकडेवारीनुसार विजयाच्या टक्केवारीत श्रेयस अय्यरने या दोघांनाही मागे टाकले आहे. सध्या पंजाब किंग्सचे (Punjab Kings) नेतृत्व करणाऱ्या अय्यरने आतापर्यंत ज्या तीन संघांचे नेतृत्व केले, त्या तिन्ही संघांना त्याने अंतिम फेरीपर्यंत नेण्याचा पराक्रम केला आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याचा विजयाचा दर धोनी आणि रोहितपेक्षा जास्त आहे.
आयपीएलमध्ये किमान 50 सामन्यांत नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांचा विचार केला, तर श्रेयस अय्यर अव्वल स्थानी विराजमान आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखालील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून त्याची विजयाची टक्केवारीदेखील 58.82 आहे, मात्र त्याने केवळ 51 सामन्यांत नेतृत्व केले आहे. एमएस धोनी 58.36 टक्क्यांसह तिसऱ्या, शेन वॉर्न (56.36 टक्के) चौथ्या आणि रोहित शर्मा 56.32 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वाखाली 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला प्रथमच अंतिम फेरीत नेले होते. त्यानंतर 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) जेतेपद मिळवून दिले. गेल्या हंगामात पंजाब किंग्सचे कर्णधारपद भूषवताना त्याने संघाला फायनलपर्यंत मजल मारून दिली होती, मात्र जेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. या हंगामात पंजाब किंग्सचा पहिला सामना ३१ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. कोलकाताला चॅम्पियन बनवणारा अय्यर आता पंजाबचा अनेक वर्षांचा खिताबी दुष्काळ संपवून आपला रेकॉर्ड अधिक मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.