
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
भारतीय खेळाडू आपल्या जिद्द, दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेच्या भावनेने देशाचे नेतृत्व करतील. तसेच कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा मिळेल. कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. आपले खेळाडू जिद्द, मेहनत आणि दृढ संकल्प घेऊन या स्पर्धेत सहभागी होतील असा मला पूर्ण विश्वास आहे.
यंदाच्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मोहिमेचे नेतृत्व देशातील ऑलिंपिक आणि अनुभवी खेळाडू करत आहे. यासाठी भारताचे अनेक खेळाडू मैदानात उतरणार आहेत. भारताचा गोल्डन बॉय आणि ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यंदाच्या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तो भारतासाठी सुवर्णपदक जिंकून आणणारच अशी अपेक्षा सर्वांना आहे. ऑलिम्पिक पदकविजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू पुन्हा एकदा राष्ट्रकुलच्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.
As the Commonwealth #Glasgow2026 Games begin, my best wishes to the Indian contingent. I am confident that our athletes will participate in the Games with passion, determination and a spirit of excellence. The skills and dedication of our athletes always inspire countless… pic.twitter.com/caenX35LdG — Narendra Modi (@narendramodi) July 24, 2026
अनेक युवा आणि अनुभवी खेळाडू ज्यामध्ये बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस, अॅथलेटिक्स आणि लॉन बॉल्स यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. ग्लासगो येथील ओव्हीओ हायड्रो अरेना येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहेन यांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन भारतीय दलाचे नेतृत्व केले.
बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये झाले होते. या स्पर्धेत भारताने अत्यंत चांगळे प्रदर्शन केले आहे. भारताने या स्पर्धेत एकूण 61 पडकांची कमाई केली होती. भारत या स्पर्धेत चौथ्या स्थानावर होता. यामध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश होता. यंदा ग्लासगो २०२६ कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे. त्यामुळे 1994 नंतरची ही सर्वात लहान स्वरूपाची कॉमनवेल्थ स्पर्धा ठरली आहे.