Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना बॅटर्स ना बॉलर्स! R. Ashwin ने फाडलं Hardik Pandya वर पराभवाचं पूर्ण बिल; म्हणाला, ‘बालिश चुकीमुळे…’

आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आरसीबीला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवासाठी रविचंद्रन अश्विनने हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाला जबाबदार धरले. मुंबई इंडियन्स जिंकू शकली असती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 13, 2026 | 03:15 PM
आर. अश्विनने फोडले हार्दिक पंड्यावर पराभवाचे खापर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

आर. अश्विनने फोडले हार्दिक पंड्यावर पराभवाचे खापर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • हार्दिक पंड्याच्या चुकीमुळे हरली मुंबई इंडियन्स 
  • रवीचंद्रन अश्विनने फोडले पराभवाचे खापर
  • हार्दिकची बालिश चूक अन्…
IPL 2026 च्या हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव झाल्यानंतर, हार्दिक पांड्याचे कर्णधारपद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने हार्दिकच्या नेतृत्वावर आणि धोरणात्मक निर्णयांवर जोरदार टीका केली आहे. अश्विनने विशेषतः रजत पाटीदारविरुद्ध मयंक मार्कंडेला क्षेत्ररक्षणाची संधी देण्याच्या निर्णयाला एक बालिश चूक म्हटले आहे, ज्यामुळे सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले. हार्दिक सध्या अनेक चुकीचे निर्णय घेत असल्याचे चाहत्यांचेही म्हणणे आहे. पुन्हा एकदा हार्दिकवर त्याच्या कॅप्टन्सीबाबत टीका सुरू झाली आहे. दरवर्षी IPL मध्ये हार्दिक पांड्यासह काही ना काही होतच असल्याचे दिसून आले आहे. 

MI vs RCB: दोन्ही भावांच्या नात्यात बिघाड? हार्दिकच्या विकेटवर कृणालचे वेगळेच सेलिब्रेशन, मैदानावर भलताच ड्रामा!

R. Ashwin ने हार्दिकला दोष दिला

आर. अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर २०२४ मधील एका जुन्या सामन्याचा संदर्भ देत हार्दिकच्या कर्णधारपदावर निशाणा साधला. पाटीदारने पूर्वी मार्कंडेवर कशी टीका केली होती, याची त्याने आठवण करून दिली. अश्विन म्हणाला, “रजत पाटीदार फिरकी गोलंदाजांविरुद्ध एक जबरदस्त फलंदाज आहे. जेव्हा तो फलंदाजीला आला, तेव्हा तुम्ही लगेच चेंडू मार्कंडेच्या हातात दिला? तो शहाणपणाचा निर्णय नव्हता. हे खूपच सामान्य दर्जाचे कर्णधारपद आहे.”

एकाच षटकाने सर्व काही बिघडवले

अश्विनने आकडेवारीचा वापर करून स्पष्ट केले की, २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मार्कंडेयच्या एका षटकात पाटीदारने चार षटकार मारले होते आणि रविवारीही जवळपास तशीच परिस्थिती होती. तो पुढे म्हणाला, “मार्कंडेयच्या मनात काय चालले होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पाटीदारने त्याला हैदराबादमध्ये धुतल्याप्रमाणे मारले होते आणि येथेही त्याने पहिल्याच चेंडूपासून त्याच्यावर हल्ला चढवला.”

MI vs RCB Live Score: मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात घात! आरसीबीने 18 धावांनी मारली बाजी; हार्दिक पांड्याची सेना पुन्हा अपयशी

एकाच निर्णयामुळे सामना गमवावा लागला का?

आर. अश्विनने स्पष्ट केले की, वानखेडेची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल नव्हती, परंतु एका चुकीच्या रणनीतीने परिस्थिती आणखी बिघडवली. मयंक मार्कंडेयने केवळ दोन षटकांत ४० धावा दिल्या, तर मिचेल सँटनरनेही ४३ धावा दिल्या. अश्विनच्या मते, मुंबईच्या गोलंदाजांनी पाटीदारला क्रीजवर स्थिरावण्याची पुरेशी संधी दिली, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आणि अवघ्या १७ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून आरसीबीची धावसंख्या २४० पर्यंत पोहोचवली.

अश्विनची हार्दिकच्या कर्णधारपदावरील टीका नवीन नाही. आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच, अश्विनने सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करावे, असे सुचवले होते. अश्विनच्या मते, मोठ्या सामन्यांमध्ये योग्य वेळी योग्य गोलंदाजाची निवड करणे हीच कर्णधाराची खरी कसोटी असते, आणि या कामात हार्दिक पूर्णपणे अपयशी ठरला.

Web Title: R ashwin said hardik pandya bad captaincy cost loss against rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • MI vs RCB
  • R Ashwin

संबंधित बातम्या

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर
1

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर

MI vs RCB: दोन्ही भावांच्या नात्यात बिघाड? हार्दिकच्या विकेटवर कृणालचे वेगळेच सेलिब्रेशन, मैदानावर भलताच ड्रामा!
2

MI vs RCB: दोन्ही भावांच्या नात्यात बिघाड? हार्दिकच्या विकेटवर कृणालचे वेगळेच सेलिब्रेशन, मैदानावर भलताच ड्रामा!

RR मॅनेजरचा वाद चिघळला, ‘फुफ्फुस फेल’; मेडिकल इमर्जन्सीमुळे डगआऊटमध्ये फोन पाहिल्याचा हवाला
3

RR मॅनेजरचा वाद चिघळला, ‘फुफ्फुस फेल’; मेडिकल इमर्जन्सीमुळे डगआऊटमध्ये फोन पाहिल्याचा हवाला

MI vs RCB Live Score: मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात घात! आरसीबीने 18 धावांनी मारली बाजी; हार्दिक पांड्याची सेना पुन्हा अपयशी
4

MI vs RCB Live Score: मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात घात! आरसीबीने 18 धावांनी मारली बाजी; हार्दिक पांड्याची सेना पुन्हा अपयशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.