
आर. अश्विनने फोडले हार्दिक पंड्यावर पराभवाचे खापर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
R. Ashwin ने हार्दिकला दोष दिला
आर. अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर २०२४ मधील एका जुन्या सामन्याचा संदर्भ देत हार्दिकच्या कर्णधारपदावर निशाणा साधला. पाटीदारने पूर्वी मार्कंडेवर कशी टीका केली होती, याची त्याने आठवण करून दिली. अश्विन म्हणाला, “रजत पाटीदार फिरकी गोलंदाजांविरुद्ध एक जबरदस्त फलंदाज आहे. जेव्हा तो फलंदाजीला आला, तेव्हा तुम्ही लगेच चेंडू मार्कंडेच्या हातात दिला? तो शहाणपणाचा निर्णय नव्हता. हे खूपच सामान्य दर्जाचे कर्णधारपद आहे.”
एकाच षटकाने सर्व काही बिघडवले
अश्विनने आकडेवारीचा वापर करून स्पष्ट केले की, २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मार्कंडेयच्या एका षटकात पाटीदारने चार षटकार मारले होते आणि रविवारीही जवळपास तशीच परिस्थिती होती. तो पुढे म्हणाला, “मार्कंडेयच्या मनात काय चालले होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पाटीदारने त्याला हैदराबादमध्ये धुतल्याप्रमाणे मारले होते आणि येथेही त्याने पहिल्याच चेंडूपासून त्याच्यावर हल्ला चढवला.”
एकाच निर्णयामुळे सामना गमवावा लागला का?
आर. अश्विनने स्पष्ट केले की, वानखेडेची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल नव्हती, परंतु एका चुकीच्या रणनीतीने परिस्थिती आणखी बिघडवली. मयंक मार्कंडेयने केवळ दोन षटकांत ४० धावा दिल्या, तर मिचेल सँटनरनेही ४३ धावा दिल्या. अश्विनच्या मते, मुंबईच्या गोलंदाजांनी पाटीदारला क्रीजवर स्थिरावण्याची पुरेशी संधी दिली, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आणि अवघ्या १७ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून आरसीबीची धावसंख्या २४० पर्यंत पोहोचवली.
अश्विनची हार्दिकच्या कर्णधारपदावरील टीका नवीन नाही. आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच, अश्विनने सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करावे, असे सुचवले होते. अश्विनच्या मते, मोठ्या सामन्यांमध्ये योग्य वेळी योग्य गोलंदाजाची निवड करणे हीच कर्णधाराची खरी कसोटी असते, आणि या कामात हार्दिक पूर्णपणे अपयशी ठरला.