
आरसीबीकडून खेळतोय भुवनेश्वर कुमार
टीम इंडियात भुवनेश्वर परतण्याचा अंदाज
रविचंद्रन आश्विनने केले मोठे विधान
R. Ashwin To Bhuvneshwar Kumar: सध्या आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. आज आयपीएलचा 55 वा सामना पार पडणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. मात्र सध्या (Indian CricketTeam) सर्वत्र क्रिकेट विश्वात चर्चा सुरू आहे ती म्हणजे वगेवण गोलंदाज भुवनेश्वर कुमारची. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. तीमुळे भारताचा माजी फिरकीपटू आर. आश्विनने त्याच्यावर भाष्य केले आहे.
भुवनेश्वर कुमारने यंदा आरसीबीकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली आहे. भुवनेश्वर कुमार आरसीबीकडून खेळताना सध्या आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालत आहे. काल झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्सच्या 4 विकेट्स घेतल्या. यावर आता आर. आश्विनने भाष्य केले आहे. त्याने आता भुवनेश्वर कुमारची भारताच्या टी-20 संघात वापसी व्हावी असे म्हटले आहे.
काय म्हणाला आर आश्विन?
भुवनेश्वर कुमारची भारताच्या टी-20 संघात वापसी व्हावी असे मला वाटते. नवीन बॉलने तो जबरदस्त कामगिरी करत आहे. शेवटच्या ओव्हर्समध्ये देखील तो महत्वाची भूमिका बजावत आहे. फलंदाजीत देखील तो साजेशी कामगिरी करत आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्सच्या अव्वल फळीला पूर्णपणे उद्ध्वस्त केले. भुवीने अचूक मारा करत रयान रिकलटन, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या बलाढ्य फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
आर. आश्विनने या मागणीनंतर बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. भुवनेश्वर कुमारला निवडकर्ते भारतीय संघात पुनरागमनाची संधी देणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.