
ऋषभ पंतला यंदाच्या हंगामात आले अपयश
एलएसजीचे कर्णधारपद जाण्याची शक्यता
पॉईंट्स टेबलमध्ये एलएसजी शेवटच्या स्थानावर
LSG/Rishabh Pant: आयपीएलचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आज आयपीएलचा 48 वा सामना होणार आहे. दरम्यान यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियंस आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील कालच्या सामन्यानंतर आयपीएल 2026 च्या वर्तुळात मोठी उलथापालथ झाली आहे. मुंबईने लखनौचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. यामुळे एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याचे कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.
सोमवारी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊचा दारूण पराभव केला. या पराभवामुळे लखनऊच्या पदरी या हंगामातील सलग सहावा पराभव आला आहे. त्यामुळे कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मुंबईच्या हातून मिळालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात ऋषभ पंतला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. कर्णधार म्हणून ऋषभ पंतला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. एखाद दुसरा सामना सोडल्यास त्याला चांगली फलंदाजी देखील करता आलेली नाही. अचूक निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात यंदा दिसून आली नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
MI Vs LSG Live: मुंबई पलटणने मारली बाजी; लखनौवर 6 विकेट्सने विजय, पॉईंट्स टेबलमध्ये थेट…
मुंबईचा लखनौवर 6 विकेट्सने विजय
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना पार पडला. आज पलटणचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय काहीसा महागडा ठरला असे पाहायला मिळाले. एलएसजीने प्रथम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सला 229 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्सने एलएसजीचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईने या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मुंबईला यश प्राप्त झाले आहे.
एलएसजीने दिलेल्या 229 रन्सचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी केलेल्या चांगल्या सुरुवातीमुळे मुंबईचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
पाकिस्तान विरुद्ध भारत भिडणार; ‘या’ तारखेला होणार फैसला, Team India तयार, पहा कुठे होणार सामना?
दरम्यान यंदाच्या हंगामात एलएसजीचा केवळ दोन सामने जिंकला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये कर्णधार ऋषभ पंतची एलएसजी 10 व्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढील काही सामने जिंकून आपला शेवट चांगला करण्याचा प्रयत्न एलएसजी आणि कर्णधार ऋषभ पंत करताना पाहायला मिळू शकते.