
ऋषभ पंतच्या कर्णधारपदावर गोयंकांचे भाष्य
गेल्या सीझनमध्ये ऋषभ पंत एलएसजीचा कर्णधार
संजीव गोयंकांनी दिल्या पंतला शुभेच्छा
LSG/ Sanjiv Goenka: येत्या शनिवारपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. 28 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध हैद्राबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. त्यातच आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत असणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातत आता संघाचे मालक संजीव गोयंकांनी केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.
2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाने आयपीएलमध्ये डेब्यू केले. त्यावेळेस के. एल. राहुल हा लखनौचा कर्णधार होता. त्यानंतर 2025 मध्ये ऋषभ पंत लखनौचा कर्णधार झाला आहे. मात्र यंदाच्या सीझनमध्ये ऋषभ पंतला कर्णधार पदावरून हटवले जाणार आशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यंदा पंत कर्णधार राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लखनौचा कर्णधार ऋषभ पंत असणार की नाही यावर आता संघाचे मालक संजीव गोयंकांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी केलेली पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे आता ऋषभ पंत कर्णधार राहणार की नाही याबबात खुलासा झाला आहे.
RCB चे नाव बदलणार? अनन्या बिर्लांच्या ‘त्या’ उत्तराने सोशल मीडियावर IPL 2026 आधी खळबळ!
संजीव गोयंकांची पोस्ट काय?
आयपीएल हंगामाची सुरुवात होत असताना ऋषभ पंतच्या कर्णधारपदाबद्दल सुरू असलेल्या चर्चा मी वाचल्या आणि मला हसू फुटले.
Heading into the season, I had read the speculations around @RishabhPant17's captaincy and smiled. We’ve spent enough time together to know his character and commitment. Have a great season, Cap!@LucknowIPL #IPL2026 pic.twitter.com/h1AXUK4kaw — Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) March 26, 2026
त्याचा स्वभाव आणि त्याची बांधिलकी जाणून घेण्यासाठी आम्ही पुरेसा वेळ एकत्र घालवला आहे. हा सीझन तुझ्यासाठी जबरदस्त जावो, कॅप्टन.
कसा होता एलएसजीचा मागील हंगाम
संजीव गोयंका यांनी केलेल्या पोस्टनुसार ऋषभ पंतच एलएसजीचा कर्णधार असणार आहे. मागील वर्ष ऋषभ पंतच्या नेतृत्वात एलएसजीचा संघ एकूण 14 सामने खेळला. यामध्ये 6 सामने त्याने जिंकले तर 8 मध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. थोडक्यात मागील हंगाम एलएसजीसाठी एवढा खास राहिला नाही.
वादळ घोंघावणार! ‘आयपीएल’आधी Virat Kohli ने दाखवला क्लास; फक्त 12 चेंडूत…; विरोधकांना इशारा
RCB चे नाव बदलणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची विक्री झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे मालकी हक्क 17 हजार 700 कोटींमध्ये विकले गेले आहेत. त्यानंतर आता आरसीबीचे नाव बदलले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे मालकी हक्क विकले गेल्यावर संघाचे नाव बदलले जाणार का अशी चर्चा सुरू आहे. मात्र अनन्या बिर्ला यांची सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांच्या पोस्टनुसार रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे नाव बदलले जाणार नाहीये.