
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये केली कमाल
18 वर्षांपेक्षा वय कमी असल्याने निर्माण झाला वाद
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी
Vaibhav Suryvanshi/RR In IPL 2026: आयपीएल 2026 चा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. रोज अनेक खेळाडू एखादा विक्रम आपल्या नावावर करत आहे. त्यातच आता एक नवीन वाद उभा राहिला आहे. वैभव सूर्यवंशीचे वय कमी असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बालकामगार कायद्यानुसार राजस्थान रॉयल्सवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
आयपीएल 2026 च्या लिलावात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला सामील करून घेण्यात आले. या ऐतिहासिक निवडीनंतर सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. इतक्या लहान वयात व्यावसायिक क्रिकेट खेळणे हा ‘बालकामगार’ कायद्याचे उल्लंघन आहे का? 18 वर्षांखालील खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागाबाबत भारतीय कायदा आणि बीसीसीआयचे नियम काय सांगतात? हे जाणून घेऊयात.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या वयावरून एका सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते आयपीएलमध्ये व्यावसायिक खेळात एका १५ वर्षांच्या किशोरवयीन मुलाला उतरवणे हे बालकामगार कायद्याचे आणि बालहक्कांचे उल्लंघन असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी संबंधित कार्यकर्त्याने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ; फक्त 43 रन्स करताच ‘हा’ रेकॉर्ड होणार नावावर
बालकामगार कायदा आणि आयपीएल
भारतीय बालकामगार कायद्यानुसार मुलांना घातक उद्योगांमध्ये (उदा. फटाके कारखाने, खाणी) काम करण्यापासून रोखण्यासाठी आहे. मात्र काही ठिकाणी यामध्ये सूट दिली जाते, असे समोर येत आहे. चित्रपट, टीव्ही मालिका आणि जाहिरातींप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातून या कायद्याला वगळण्यात आल्याचे समोर येत आहे. आयपीएल ही एक अत्यंत शिस्तबद्ध, नियमानुसार चालणारी स्पर्धा आहे. जी बीसीसीआयच्या अंतर्गत खेळवली जाते.
RR Vs SRH Live: वैभवचं ‘शतक’ अन फरेराचं ‘तुफान’; ‘एसआरएच’ला विजयासाठी 229 रन्सचे टार्गेट
18 वर्षांखालील खेळाडू असल्याच मुलाच्या पालकांची परवानगी असणे महत्वाचे असते. संघ आणि बीसीसीआय या खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आलेला प्रश्न किंवा त्यांच्या मागणीला किती यश मिळणार हे येत्या काळातच पाहायला मिळणार आहे.
वैभव सूर्यवंशीने केवळ 43 रन्स केल्या, तर तो एकाच आयपीएलच्या हंगामात 230 च्या कदाचित यापेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने 400 रन्स पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे. अवघ्या 16 व्या वर्षी जागतिक स्तरावरील गोलंदाजांचा समाचार घेत अशा स्ट्राईक रेटने रन्स करणे , ही क्रिकेटमधली एक चांगली गोष्ट समजली जात आहे. यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशीने तडाखेबंड खेळी केली आहे.