
Sachin की Virat? सौरव गांगुलीने अखेर 'किंग' कोण ते सांगूनच टाकलं! वाचा सविस्तर...
सचिन तेंडुलकर जगातील मोठा खेळाडू – गांगुली
सौरव गांगुलीने केले भाष्य
विराट अन् सचिनमध्ये सर्वोत्तम कोण यावर केले विधान
Sourav Ganguly: क्रिकेट विश्वात अनेक खेळाडू प्रसिद्ध आहे. भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटू यांनी क्रिकेट जगतात अनेक मोठे रेकॉर्ड केले आहेत. दरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात सर्वोत्तम खेळाडू कोण आहे याबाबत भाष्य केले आहे. सौरव गांगुली नेमके काय म्हणाला आहे ते जाणून घेऊयात.
सचिन तेंडुलकर की विराट कोहली यांच्यात बेस्ट खेळाडू कोण आहे याबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने भाष्य केले आहे. सचिन तेंडुलकर जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचे त्याने म्हटले असल्याचे समोर येत आहे. त्याने सार्वजनिकरित्या दोघांमध्ये चांगले कोण असे सांगितले नाही. मात्र त्याने सचिन तेंडुलकरसोबत 14 वर्षे क्रिकेट खेळले आहे. त्याला जवळून खेळताना पाहिले आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. मात्र सचिन हा मोठा खेळाडू आहे, असे सौरव गांगुली म्हणाला असल्याचे समोर आले आहे.
पुढे सौरव गांगुली म्हणाला, “मी सचिनसोबत 250 पेक्षा जास्त एकदिवसीय सामन्यांमध्ये ओपन केले आहे. मी त्याला जवळून खेळताना पाहिले आहे. आमच्यावेळेस एकापेक्षा एक भारी गोलंदाज होते. त्यांच्यासमोर धावा करणे सोपे नव्हते. त्यामुळे नक्कीच तेंडुलकरसारखे दुसरे कोणी नाही.”
“मी धोनीला सांगेन…”, MS Dhoni च्या निवृत्तीच्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं मोठं विधान!
MS Dhoni च्या निवृत्तीच्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं मोठं विधान!
IPL २०२६ च्या रणधुमाळीत सध्या एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे.”हा महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा सीझन आहे का?” यावर बऱ्याच चर्चा रंगल्यात आहेत. चेन्नईमध्ये IPL 2026 च्या सुरुवातीला एक मोठा इव्हेंट आयोजित केला होता. त्यातही महेंद्र सिंह धोनीला हा प्रश्न विचारण्यात आला होता. आताही यावर आता टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्याच्या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Rinku Singh : रिंकू सिंह बनला ‘रीजनल स्पोर्ट्स ऑफिसर’; जाणून घ्या किती मिळणार पगार…
एम.एस. धोनी पहिल्याच हंगामापासून (२०१६ आणि २०१७ चा अपवाद वगळता) चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, त्याने CSK ला पाच विजेतेपदे मिळवून दिली आहेत. या हंगामात धोनी खेळाडू म्हणून शेवटच्या वेळी मैदानात उतरणार का, याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, अशा चर्चा केवळ या हंगामातच नव्हे, तर गेल्या चार-पाच हंगामांपासून सातत्याने होत आल्या आहेत. IPL २०२६ हा खेळाडू म्हणून धोनीचा खरोखरच शेवटचा हंगाम असेल की नाही, याचे उत्तर केवळ धोनीलाच माहित आहे. सौरव गांगुलीने अलीकडेच या संभाव्य परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे.