
manav suthar
गॉल स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा दणदणीत पराभव केला आहे. यामुळे भारताने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा अधिक पक्क्या केल्या असून गुणतालिकेत आपली टक्केवारी कमालीची सुधारली आहे. डाव्या हाताचा फिरकीपटू मानव सुथार या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.
मानव सुथारने या सामन्यात अचूक आणि भेदक गोलंदाजी केल्याचे दिसून आले. त्याने या सामन्यात एकूण १० फलंदाज आउट केले. पहिल्या डावात मानव सुथारने ७६ रन्स डेट ४ विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात ५५ रन्स डेट मानव सुथारने ६ विकेट्स घेतल्या. मानव सुथारने आपल्या कारकिर्दीत पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सलग ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. मानव सुथार हा भारतीय कसोटी क्रिकेटच्या ९३ वर्षांच्या इतिहासातील फक्त पाचवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी या यादीत नरेंद्र हिरवाणी अग्रस्थानी आहेत.
देवदत्त पाडिक्कलने साकारलेली १६७ धावांची दमदार शतकी खेळी आणि लोकेश राहुलच्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या जोरावर भारताने ४६२ धावांचा डोंगर उभा केला होता. श्रीलंकेचा पहिला डाव २८४ वर ऑल आउट झाला. तर दुसऱ्या डावात श्रीलंकेने भारताला १९३ रन्सवर रोखले आहेत. या डावात ऋषभ पंतने ६६ रन्स तर देवदत्त पडीकलने ४४ रन्सची खेळी केली.
IND Vs SL: विजयश्री मिळाली पण आनंद साजरा करता येईना! WTC Points Table मध्ये बसला फटका