
'गेम चेंजर'
भारताचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नईमध्ये होणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे संथ मानली जाते. त्यामुळे फिरकीपटूंना मदत मिळते आणि त्याचा परिणाम फलंदाजांना धावा काढण्यास फिरकीचा सामना करावा लागतो. रिपोर्टनुसार, या सामन्यासाठी “नवीन खेळपट्टी (पीच)” वापरली जाणार आहे. ज्यावर अद्याप एकही सामना खेळला गेलेला नाही.
त्यामुळे या नवीन खेळपट्टीवर बॉल अधिक चांगल्या पद्धतीने बॅटवर येईल आणि त्याचा फायदा भारतीय फलंदाजांना होणार आहे. बॉल बॅटवर थेट येत असेल तर भारतीय फलंदाज तुफानी खेळू शकतात. अशा परिस्थितीत कॅप्टन सुर्या आणि टीमला या मॅचसाठी रणनीती बनवणं सोपं ठरु शकतं.
भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांचा पराभव केल्यास भारताचे ४ गुण होतील. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज एकाच दिवशी अहमदाबादमध्ये आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारताच्या दृष्टीने बराच महत्त्वाचा आहे.
दक्षिण आफ्रिका संघाने वेस्ट इंडिजविरोधातील सामना जिंकत सगळे सामने जिंकल्याने भारताचा सेमीफायनलमधील मार्ग सुखकर ठरु शकतो. त्यामुळे भारत आपले दोन्ही मॅच जिंकत साउथ आफ्रिकेसोबत सेमीफायनलमध्ये पोहोचेल. परंतु जर दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला तर तिन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण होऊ शकतात.अशा परिस्थितीत नेट रन रेट (NRR) च्या आधारे निर्णय घेतला जाईल.
आता टीम इंडियाला फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. फलंदाजांना धुंवाधार खेळी करत मोठी धावसंख्या बनवावी लागेल तर गोलंदाजांना विरोधी संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल. स्पर्धेच्या या टप्प्यावर छोटीशी चूकही महागात पडू शकते.
सध्यातर सर्वांच्या नजार चेन्नईच्या खेळपट्टीवर आणि भारताच्या कामगिरीवर टिकून आहेत. जर नवीन खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्थ ठरली, तर ती सेमीफायनलच्या शर्यतीत टीम इंडियासाठी ‘मोठा बुस्टर’ ठरणार आहे.