सेमीफायनलसाठी पात्र ठरण्यासाठी भारतासमोर दोन संघांंचं आव्हानं आहे. भारताने साउथ आफ्रिकासोबत खेळला गेलेला पहिला सामना गमावला असल्याने पुढील दोन्ही सामने जिंकणं फार आवश्यक आहे.
जर भारत वेस्टइंडीज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांचा पराभव करेल तर त्याचे ४ अंक होतील. जर साउथ आफ्रिका त्यांचे उर्वरित सामने जिंकतील तर भारत आणि साउथ आफ्रिका दोन्ही संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
जर भारत दोन्ही मॅच जिंकेल आणि साउथ आफ्रिका त्यांचा एक सामना गमावतील तर ३ संघांचे अंक सारखे होतील. अशा परिस्थितीत कोणते संघ सेमीफायनल खेळतील हे नेट रन रेटवरुन ठरवलं जाईल.
जर भारतने आपले दोन्ही सामने जिंकले आणि साउथ आफ्रिकेला आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर भारत आणि वेस्टइंडीज हे दोन्ही संघन सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
यापुढे खेळल्या जाणाऱ्या सामन्यांपैकी भारत फक्त एक सामाना जिंकू शकला तर त्याची सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी हुकते. इतर परिस्थितीत काहीही बदल झाला तरीही भारत एका विजयाने सेमी फायनलमध्ये पोहोचू शकणार नाही.
भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पुढचा सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरोधात खेळला जाणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना 1 मार्चला वेस्टइंडीज संघासोबत खेळला जाईल. सध्या वेस्टइंडीय संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. वेस्टइंडीजने आतापर्यंत खेळलेले पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतासमोर हे मोठं चॅलेंज ठरणार आहे.
सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात भारतविरोधात झालेल्या मॅचमध्ये साउथ आफ्रिकाने भारताचा पराभव करत दणदणीत सुरुवात केली आहे. त्यामुळे साउथ आफ्रिकाकडे चांगला मुमेंटम आहे. भारतावर विजय मिळवल्यानंतर आता साउथ आफ्रिका संघाला वेस्टइंडीज आणि जिम्बाब्वे यांच्याविरोधात खेळायचं आहे. जर साउथ आफ्रिका संघाने त्यांचे उर्वरीत दोन्हीही सामने जिंकले तर त्यांची सेमीफायनलमधील जागा निश्चित होईल.
सुपर 8 तालिकेत 4-4 संघांचे मिळून 2 ग्रुप केले गेले आहेत. या ग्रुपमध्ये प्रत्येक संघ आपल्या ग्रुपमधील संघांविरोधात प्रत्येकी 3-3 सामने खेळेल. याचा अर्थ प्रत्येक ग्रुपमध्ये 6 सामने खेळले जातील. अशा प्रकारे दोन्ही ग्रुपला मिळून 12 सामने खेळले जातील. या 12 सामन्यांपैकी आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. उर्वरीत सामने खेळल्यानंतर त्या ग्रुपमधील 2-2 टॉप संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.
पात्र ठरलेले संघ सेमीफायनलसाठी सज्ज होतील. 4 मार्चला पहिली सेमीफायनल खेळली जाईल. तर 5 मार्चला वानखेडे स्टेडियमवर दुसरी सेमीफायनल खेळली जाईल. या दोन्ही सेमीफायनलमध्ये विजय मिळवणाऱ्या टीम थेट 8 मार्चला एकमेकांविरोधात फायनलमध्ये धडकतील. टी-20 विश्वचषक 2026मधील सर्वच संघ तितक्याच ताकदीने लढताहेत त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणते संघ फायनलमध्ये धडक मारतील आणि विश्वचषक कोण जिंकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






