
सध्या बांग्लादेशमध्ये महिलांची आशिया कप क्रिकेट (Women’s Asia Cup) स्पर्धा सुरु आहे. यात आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंडच्या संघाशी होता. या सामन्यात भारताने जबरदस्त प्रदर्शन करत थायलंडच्या संघाला अवघ्या ३७ धावांमध्ये ऑलआउट केले आहे. भारताने थायलंडला अक्षरक्ष: गुडघे टेकायला भाग पाडले.
आज भारतीय संघा विरुद्ध खेळताना थायलंडची टीम पूर्णपणे अपयशी ठरली. भारतीय महिला संघने अवघ्या ६ ओव्हर्समध्ये थायलंडच्या संघाला माघारी धाडलं आणि भारताने ९ विकेट आणि ८४ चेंडू राखून सामना जिंकला. थायलंडची टीम प्रथम फलंदाजी करत होती. थायलंडचे चार फलंदाज खातही उघडू शकले नाहीत. तर केवळ एका फलंदाजाने दोन आकडी धावासंख्या गाठली. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा स्कोर १२ धावा होता. थायलंडच्या फलंदाजांनी खराब प्रदर्शन केलं. पण त्याचवेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर बॉलिंग केली.