Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: बंगळूरु चेंगराचेंगरीवर विराट कोहलीने 3 महिन्यांनंतर मौन सोडले, म्हणाला- “आनंदाचा क्षण एका दुःखद….”

बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा बळी गेला. या हृदयद्रावक घटनेवर आता विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली असून, आरसीबीच्या वतीने पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 03, 2025 | 02:57 PM
Virat Kohli: बंगळूरु चेंगराचेंगरीवर विराट कोहलीने 3 महिन्यांनंतर मौन सोडले, म्हणाला- “आनंदाचा क्षण एका दुःखद….”
Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli On Bengaluru Stampede: आयपीएल 2025 चा (IPL 2025) हंगाम अनेक कारणांमुळे खास होता, पण त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB) 18 वर्षांनंतर अखेर विजेतेपद पटकावले. संपूर्ण देश आनंदात असताना, नियतीने घात केला आणि 4 जून रोजी बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने देशाला हादरवून सोडले. आरसीबीच्या विजयानंतर झालेल्या या दुःखद अपघातात 11 लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर 56 जण गंभीर जखमी झाले. व्यवस्थापनातील त्रुटींमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले. या हृदयद्रावक घटनेवर आता विराट कोहलीने मौन तोडले असून, पीडितांच्या कुटुंबीयांसाठी एक भावनिक संदेश पाठवला आहे.

विराट कोहलीने पीडितांच्या कुटुंबियांसाठी व्यक्त केली सहानुभूती

आरसीबीने नुकतीच RCB Cares नावाची एक संस्था सुरू करण्याची घोषणा केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून, चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली जाणार आहे. आरसीबीच्या अधिकृत वेबसाइटवर विराट कोहलीचे एक निवेदन प्रसिद्ध झाले आहे. या निवेदनात कोहली म्हणाला, “4 जून रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेसाठी कोणीही तयार नव्हते. आमच्या फ्रँचायझीसाठी आनंदाचा क्षण एका दुःखद घटनेत बदलला. ज्यांनी आपले प्रियजन गमावले किंवा जखमी झाले, त्या सर्व कुटुंबांचा मी विचार करत आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे नुकसान आता आमच्या कथेचा भाग आहे. आपण सर्वजण आता काळजी, सन्मान आणि जबाबदारीने एकत्र पुढे जाऊ.”

Virat Kohli on the tragic events in Bengaluru. pic.twitter.com/MwMgMb9JaJ — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 3, 2025

हे देखील वाचा: ‘आमच्या नात्यावर परिणाम, माझी चूक झाली..’, किंग कोहलीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावरुन माजी क्रिकेटपटू गहिवरला 

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरची परिस्थिती कशी बिघडली?

आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अचानक चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयाचा उत्सव साजरा करण्याची घोषणा केली. आयोजनात योग्य नियोजनाचा अभाव होता आणि पुरेसे पोलिस कर्मचारीही उपलब्ध नव्हते. आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमली, ज्यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. कर्नाटक उच्च न्यायालयाने या घटनेसाठी आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला जबाबदार धरले आहे.

बंगळूरुमधून सामने इतर ठिकाणी हलवले

या घटनेनंतर, कर्नाटक सरकारने चिन्नास्वामी स्टेडियमला ‘असुरक्षित’ घोषित केले आहे. यामुळे, महिला विश्वचषकाचे सामने बंगळूरुमधून नवी मुंबईला हलवण्यात आले आहेत. तसेच, स्थानिक क्रिकेट लीग महाराजा टी-20 चे सामनेही बंगळूरुऐवजी म्हैसूर येथे खेळवले जात आहेत. बंगळूरुमध्ये लवकरच 60,000 प्रेक्षक क्षमतेचे नवीन स्टेडियम बांधले जाणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे.

Web Title: Virat kohli breaks silence on bengaluru stampede after 3 months says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • Bengaluru
  • cricket
  • RCB
  • Sports News
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री
1

NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री

NZ vs CAN : T20 World Cup 2026 मध्ये Yuvraj Samra ची स्फोटक कामगिरी! शतक झळकावत विश्वविक्रम केला नावावर
2

NZ vs CAN : T20 World Cup 2026 मध्ये Yuvraj Samra ची स्फोटक कामगिरी! शतक झळकावत विश्वविक्रम केला नावावर

गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!
3

गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!

Mohammed Shami ने या स्पर्धेत केला कहर! उघडला पंजा, उपांत्य फेरीच्या सामन्यात फलंदाजांना केले चकित…
4

Mohammed Shami ने या स्पर्धेत केला कहर! उघडला पंजा, उपांत्य फेरीच्या सामन्यात फलंदाजांना केले चकित…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.