Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा भारताची जबाबदारी कोहली आणि के एल राहुलच्या खांद्यावर, हे खेळाडू फेल

उपांत्य फेरीत भारतासाठी शानदार शतक झळकावणारा श्रेयस अय्यर अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ ४ धावा करून बाद झाला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 19, 2023 | 04:05 PM
पुन्हा भारताची जबाबदारी कोहली आणि के एल राहुलच्या खांद्यावर, हे खेळाडू फेल
Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड कप २०२३ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल : वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमध्ये भारताची सुरुवात काही खास झाली नाही. उपांत्य फेरीत भारताचे हिरो ठरलेले संघाचे तीन स्टार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. या तीन फलंदाजांमध्ये कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. तथापि, कर्णधार रोहित शर्माने ४७ धावांची खेळी खेळली जी त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतही खेळली होती. पण श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल अतिशय स्वस्तात परतले. आता विराट कोहली मैदानावर दमदार खेळी करेल अशी आशा आहे.

गिलची विकेट पडल्यानंतर विराट कोहली क्रीझवर आला. त्यानंतर श्रेयस अय्यरची विकेट पडल्यानंतर केएल राहुल क्रीजवर आला. वृत्त लिहिपर्यंत विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर उपस्थित होते. विश्वचषक २०२३ च्या पहिल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीने ८५ आणि केएल राहुलने ९७* धावा केल्या. अशा परिस्थितीत दोन्ही खेळाडूंकडून पुन्हा एकदा तशीच अपेक्षा असेल.

सलामीला आलेल्या भारतीय कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावा जोडल्या होत्या. अंतिम सामन्यात हिटमॅनने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली. १० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा ग्लेन मॅक्सवेलचा बळी ठरला. मात्र उपांत्य फेरीत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावांची नाबाद खेळी करणारा शुभमन गिल अंतिम फेरीत केवळ ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिल डावाच्या ५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कचा बळी ठरला.

उपांत्य फेरीत भारतासाठी शानदार शतक झळकावणारा श्रेयस अय्यर अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ ४ धावा करून बाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अय्यरने ७० चेंडूंत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. पण आज अंतिम सामन्यात अय्यर ११ व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सचा बळी ठरला. कर्णधार रोहित शर्मा याच्या दोन षटकांपूर्वी बाद झाला.

Web Title: World cup 2023 india vs australia final world cup trophy world cup qualifiers international cricket world cup host country cricket updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2023 | 04:05 PM

Topics:  

  • Cricket updates
  • India Vs Australia
  • international cricket
  • World Cup 2023
  • World Cup Host Country
  • World Cup Qualifiers
  • World cup trophy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.