
भारत सरकारचा मोठा निर्णय! Google आणि YouTube सोबत केली भागीदारी, 15000 क्रिएटर्सना देणार मोफत AI प्रशिक्षण
भारतात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआयमुळे व्हिडीओ, कंटेट आणि फोटो बनवण्याच्या पद्धतीमध्ये देखील मोठा बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक शहरांमधील क्रिएटर्सकडे एआय टूल्स तर आहेत, पण त्यांचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत अनेकांना माहिती नसतं. याच कारणामुळे सूचना प्रसारण मंत्रालय आणि IICT ने गूगल आणि यूट्यूबसह भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागीदारीअंतर्गत आणि प्रोग्रामद्वारे क्रिएटर्सना केवळ बेसिक लर्निंगच नाही तर स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग देखील मिळणार आहे. भारत सरकारचे ध्येय आहे की, एनिमेशन, गेमिंग आणि डिजिटल कंटेटसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये क्रिएटर्स एआयचा वापर अगदी सहजपणे करू शकतील. क्रिएटर्सना अचूक एआय प्रशिक्षण दिल्याने, ते उच्च-गुणवत्तेचे काम तयार करू शकतील. यासोबतच एआयद्वारे क्रिएटर्स जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांचे कार्य क्षेत्र अधिक वाढण्यासाठी मदत होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
क्रिएटर्सची ही ट्रेनिंग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिला टप्पा बेसिक एआय ज्ञानावर आधारित असणार आहे. यामध्ये सहभागी झालेल्या क्रिएटर्ससाठी लर्निंग कोर्स उपलब्ध केला जाणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर सहभागी झालेल्या क्रिएटर्सना सर्टिफिकेट देखील दिले जाणार आहे. पहिल्या टप्पात क्रिएटर्सना शिकवले जाईल की एआय कसे काम करते आणि त्यांचा वापर कंटेट क्रिएशनसाठी कसा केला जाऊ शकतो. या ट्रेनिंगचा दुसरा टप्पा जास्त प्रॅक्टिकल असणार आहे आणि यामध्ये ट्रेनिंग, रियल प्रोजेक्ट्स आणि प्लॅटफॉर्म बेस्ड ट्रेनिंग सारख्या काही प्रोसेस समाविष्ट असणार आहेत. या टप्प्यामध्ये क्रिएटर्स गोष्ट सांगण्याची कला शिकणार आहेत आणि एडवांस एआय टूल्सचा वापर करण्यास शिकणार आहेत. याव्यतिरिक्त यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर पुढे जाणं आणि ग्रो करणं शिकणार आहेत. हे प्रशिक्षण देशातील प्रमुख क्रिएटिव्ह शहरांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपांत दिले जाईल.
भारतात डिजीटल कंटेंट क्रिएटर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांची क्वालिटी आणि कमाई वेगवेगळी आहे. त्यामुळे, एआयचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर, ते आपल्या कामात सुधारणा करू शकतील आणि जागतिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. हे एआय कौशल्य विकास कार्यक्रम भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.