आता नवीन Sim Card खरेदी करणं होणार कठीण, शासनाने दिला आदेश; प्रथम करावे लागेल हे काम
तुम्हीही नवीन सीम कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता नवीन सिमकार्ड खरेदी करण्याची प्रक्रिया थोडी कठीण होणार आहे. अलीकडेच, पीएमओने दूरसंचार विभागाला (DoT) सिमकार्ड खरेदीबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. आता नवीन सिम कार्ड कनेक्शन घेण्यासाठी आधार-आधारित बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन प्रोसेस अनिवार्य झाली आहे. फसवणूक आणि गुन्हेगारी कारवायांचा वाढता आलेख पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे बनावट कागदपत्रांद्वारे सिम खरेदी करणे कठीण होणार आहे. या नियमांमध्ये काय नमूद केले आहे? यावीषयी सविस्तर जाणून घेऊयात.
नवीन सिम कार्डसाठी व्हेरिफिकेशन आहे आवश्यक
पूर्वी नवीन सिम खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी होती. नवीन सिम मिळविण्यासाठी, युजर्सना आधार कार्ड किंवा पासपोर्टसारखे कोणतेही सरकारी दस्तऐवज प्रदान करावे लागतील. परंतु नवीन नियमांनुसार, सिम ऍक्टिव्ह करण्यासाठी, आधार आधारित बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांना बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनशिवाय सिम विकण्यास स्पष्टपणे मनाई आहे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनशिवाय कोणताही रिटेलर सिम विकत असेल तर त्याच्यावरही कारवाई होऊ शकते.
Whatsapp Scam विषयी HSBC ने जारी केला अलर्ट, वेळीच सावध व्हा नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं
बनावट सिमवर सरकारची कारवाई
नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर दूरसंचार विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यात म्हटले आहे की एकाच नावाने अनेक सिम नोंदणीकृत आहेत, जे दूरसंचार नियमांचे उल्लंघन करतात. ते सायबर घोटाळ्यांशी संबंधित घटनाही घडवून आणतात. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमओने दूरसंचार विभागाला गुन्हेगारांना ओळखण्यासाठी एआयची (AI) मदत घेण्यास सांगितले आहे. तसेच एजन्सींसोबत जवळून काम करा.
सायबर गुन्हे प्रतिबंध
नवा आदेश हा सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी सरकारच्या नियमांचा एक भाग आहे. आधार बेस्ड व्हेरिफिकेशन लागू केल्याने अनव्हेरिफाइड मोबाइल नंबर वापरून केलेल्या फसवणुकीचा शोध घेणे सोपे होईल.
Mahakumbh 2025: मोबाईल स्क्रीनवर होईल फुलांचा वर्षाव, फक्त Google वर सर्च करा हा शब्द
संचार साथी पोर्टलची सर्व्हिस
संचार साथी पोर्टलवर अनेक प्रकारच्या सर्व्हिस उपलब्ध आहेत. ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. याद्वारे सायबर फसवणूक आणि फसवणुकीच्या तक्रारी करता येतील. संचार साथी पोर्टलवर आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाते. जर तुमचा फोन चोरीला गेला असेल तर तो या पोर्टलद्वारे ब्लॉकही केला जाऊ शकतो. या पोर्टलचा उद्देश घोटाळ्यांना आळा घालणे हा आहे.