• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Process Of Providing Internet Connection To Villages Is Slow

ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची प्रक्रिया धिम्या गतीने! 28 टक्के गावांमध्ये एफटीटीएच कनेक्शन

गावांमध्ये इंटरनेट उपलब्ध व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारी कार्यालयांपर्यंत सर्वसामान्यांशी संबंधित जवळपास सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्यासाठी गावांमध्ये संगणक देखील देण्यात आले आहेत. परंतु या गावांमध्ये इंटरनेट सेवाच उपलब्ध नाही. देशभरात फक्त 28 टक्के गाव किंवा ग्रामपंचायतींमध्ये FTTH इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 02, 2024 | 09:09 AM
ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची प्रक्रिया धिम्या गतीने! 28 टक्के गावांमध्ये एफटीटीएच कनेक्शन (फोटो सौजन्य - pinterest)

ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची प्रक्रिया धिम्या गतीने! 28 टक्के गावांमध्ये एफटीटीएच कनेक्शन (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपला देश डिजीटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रगतीमध्ये खेड्यापाड्यातील नागरिकांना देखील सहभाग घेता यावाा, यासाठी प्रयत्न केले जात आहे. गावागावांत इंटरनेट सेवा प्रदान केली जात आहे. परंतु हा विकास धिम्या गतीने सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. डिजिटल इंडियावर सरकार भर देत आहे. जवळपास सर्वच संस्था आणि कार्यालयांमध्ये ऑनलाइन सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु या तंत्रज्ञानाच्या विकासात गावे मागे पडलेली दिसत आहेत. ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याचे प्रयत्न धिम्या गतीने सुरू आहेत.

हेदेखील वाचा- महिला सुरक्षेसाठी सरकारने लाँच केलं SHe-Box Portal; आता ऑनलाईन तक्रार करू शकणार

फायबर ऑप्टिक केबलद्वारे (फायबर टू द होम – एफटीटीएच) ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची योजना यूपीए सरकारने 2011 मध्ये सुरू केली होती. ही योजना एनडीए सरकारनेही वेगळ्या नावाने पुढे नेली होती. परंतु आज परिस्थिती अशी आहे की, देशभरात फक्त 28 टक्के गाव किंवा ग्रामपंचायतींमध्ये FTTH इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. पंचायतीपासून सर्व सरकारी कार्यालयांपर्यंत सर्वसामान्यांशी संबंधित जवळपास सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. परंतु असं असताना देखील सर्व गावांमध्ये अद्याप इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलेली नाही.

ऑनलाइन प्रणालीद्वारे पारदर्शक प्रक्रिया ग्रामपंचायतींपर्यंतही पोहोचली पाहिजे, अशी सरकारची इच्छा आहे. गावप्रमुख आणि सचिवांनी पोर्टलवर सर्व उपक्रम अपलोड करणे अपेक्षित आहे. ग्रामविकास विकास योजनाही ऑनलाइन असावी. पण, या ऑनलाइन व्यवस्था कशा चालणार आहेत, हे पंचायती राज मंत्रालयाने ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘पंचायत प्रोफाइल’वर पाहून कळू शकते. या अहवालात ग्रामपंचायतींच्या विविध योजना, सुविधा, उपक्रम आदींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये देशभरात एकूण 2,55,197 ग्रामपंचायतींचा उल्लेख करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- फेसबुक, इंस्टाग्राम की व्हॉट्सॲप… कोणत्या प्लॅटफॉर्मचे आहेत सर्वाधिक युजर्स?

यापैकी 87 टक्के ग्रामपंचायतींना स्वतःच्या इमारती आहेत. 81 टक्के ग्रामपंचायती संगणकांनी सुसज्ज आहेत, परंतु इथे इंटरनेटचा अभाव आहे. FTTH इंटरनेट सक्रिय कनेक्शनचा डेटा पाहिल्यास केवळ 28 टक्के ग्रामपंचायतींमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्याचे स्पष्ट होते. यूपीए सरकारने 2011 मध्ये ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्शन देण्यासाठी राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क नावाची योजना सुरू केली होती. 2013 पर्यंत सर्व पंचायतींना फायबर कनेक्टिव्हिटी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टात सुधारणा करून हे काम 2016 पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार हालचाली देखील सुरु झाल्या होत्या.

दरम्यान, 2014 मध्ये सरकार बदलले, पण ही योजना सुरूच राहिली. NDA सरकारने भारतनेट कार्यक्रमाच्या नावाने काम पुढे नेले आणि 2017 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याचा दावा केला. त्यानंतर 2021 पर्यंतचे उद्दिष्ट वाढवण्यात आले, परंतु हा आकडा केवळ 28 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकला आहे. ही योजना चालवणाऱ्या भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडच्या वेबसाइटवर नजर टाकली तर आनंददायी चित्र दिसून येतं आहे.

Web Title: Process of providing internet connection to villages is slow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 09:03 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.