केवळ जलमार्गच नव्हे, तर सागरी महामार्गावरून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
मेट्रो स्टेशन परिसरात एका धावत्या गाडीत स्फोट झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी एनआयए आणि एनएसजीचे पथके दाखल झाली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही.