पुण्यातील काँग्रेस भवन येथे झालेल्या दगडफेक आणि हिंसक आंदोलनानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय आंदोलनादरम्यान निर्माण झालेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि त्यानंतर झालेली कारवाई यावर त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकीय आंदोलनादरम्यान झालेली दगडफेक ही अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून दोन्ही बाजूंवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.”आंदोलन हिंसक होईल किंवा दगडफेक होईल, अशी कोणतीही पूर्वकल्पना पोलिसांकडे नव्हती. जर अशी माहिती असती, तर आंदोलनाला परवानगी दिली नसती,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा नेत्याच्या निवासस्थानी आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. महापौरांवर गुन्हा दाखल करण्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, फिर्यादीच्या जबाबावरून (Statement) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
पुण्यातील काँग्रेस भवन येथे झालेल्या दगडफेक आणि हिंसक आंदोलनानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय आंदोलनादरम्यान निर्माण झालेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि त्यानंतर झालेली कारवाई यावर त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकीय आंदोलनादरम्यान झालेली दगडफेक ही अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून दोन्ही बाजूंवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.”आंदोलन हिंसक होईल किंवा दगडफेक होईल, अशी कोणतीही पूर्वकल्पना पोलिसांकडे नव्हती. जर अशी माहिती असती, तर आंदोलनाला परवानगी दिली नसती,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा नेत्याच्या निवासस्थानी आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. महापौरांवर गुन्हा दाखल करण्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, फिर्यादीच्या जबाबावरून (Statement) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.






