अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आला असून वातावरण तापले आहे. संबंधित उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून आंदोलन तीव्र झाले आहे. विशेष म्हणजे, एक गर्भवती महिला आपल्या लहान मुलासह उपोषणाला बसली असूनही जिल्हा परिषद आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. अंतिम यादीत पात्र उमेदवारांना डावलल्याचा व अधिकाऱ्यांनी मनमानी केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन “पुन्हा भरती प्रक्रिया घेऊ” असे आश्वासन दिले. मात्र याआधी दोनदा भरती रखडल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा देत “आमच्या जीवाला काही झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी जबाबदार राहतील” असे म्हटले आहे. परिस्थिती तणावपूर्ण असून प्रशासनावर निर्णयाचा दबाव वाढला आहे.
अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आला असून वातावरण तापले आहे. संबंधित उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून आंदोलन तीव्र झाले आहे. विशेष म्हणजे, एक गर्भवती महिला आपल्या लहान मुलासह उपोषणाला बसली असूनही जिल्हा परिषद आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. अंतिम यादीत पात्र उमेदवारांना डावलल्याचा व अधिकाऱ्यांनी मनमानी केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन “पुन्हा भरती प्रक्रिया घेऊ” असे आश्वासन दिले. मात्र याआधी दोनदा भरती रखडल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा देत “आमच्या जीवाला काही झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी जबाबदार राहतील” असे म्हटले आहे. परिस्थिती तणावपूर्ण असून प्रशासनावर निर्णयाचा दबाव वाढला आहे.